वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ठणठणाट
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ठणठणाट 
मुख्य बातम्या

वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ठणठणाट

टीम अॅग्रोवन

वर्धा : जिल्हयातील १३ जलाशयांची पातळी सातत्याने खालावत असल्याने भविष्यात मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. सध्या प्रकल्पात केवळ १३.४३ टक्‍केच उपयुक्‍त जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने संबंधित विभागांना दिल्या आहेत. 

या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. परिणामी प्रकल्पही पूर्ण भरले नाहीत. धान नदी प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा आंजी (मोठी) या गावासह वर्धा शहर आणि शेजारील गावांना केला जातो. मागील महिन्यात सुकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु, सध्या या प्रकल्पासह मदन प्रकल्पांत उपयुक्‍त जलसाठा निरंक अाहे. ते कोरडे पडले आहेत.

आजच्या घडीला धाम प्रकल्पात केवळ ४.८६ टक्‍केच उपयुक्‍त जलसाठा आहे. या पाण्याचे बिगर सिंचनासाठी नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी जून २०१९ अखेरपर्यंत पुरवायचे असल्याने प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पाण्याबाबत काटकसर करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पाणीबाणी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT