poultry
poultry  
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीला १८० कोटींचा फटका

टीम अॅग्रोवन

नाशिक: पोल्ट्री उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. राज्यात दर महिन्याला होणाऱ्या साडेचार कोटी पक्ष्यांच्या उत्पादनात नाशिकचा वाटा दीड कोटी इतका आहे. मात्र कोरोनाच्या अफवेमुळे गेल्या महिन्यापासून वैयक्तिक व करार पद्धतीने काम करणारे कुक्कुटपालन अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत व्यवसायाचे १८० कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  चिकनमुळे कोरोनाचा प्रसार होतो, असा गैरप्रचार झाल्याने जिल्ह्यातील तयार कोंबड्यांचा उठाव कमी झाला. चिकनच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून ज्या पक्ष्यांवर प्रतिकिलो ७५ रुपये उत्पादन खर्च झाला, त्या पक्ष्यांची विक्री प्रतिकिलो १० ते १५ रुपयांदरम्यान करण्याची वेळ आली आहे. राज्यात उत्पादित होणारे ७० टक्के ब्रॉयलर पक्षी राज्यांतर्गत विकले जातात तर उर्वरित ३० टक्के विक्री गुजरात व मध्य प्रदेश राज्यात होते. मात्र बाजारात मागणी मंदावल्याने ५० लाख पक्षी अतिरिक्त पडून आहेत. ग्रामीण अर्थकारणाला चालना देणाऱ्या या कृषिपूरक व्यवसायाला फटका बसला आहे. गेल्या वीस वर्षात व्यवसायाने अनेक स्थित्यंतरे पाहिली, मात्र बर्ड फ्लूच्या फटक्यानंतर हा व्यवसाय सावरून उभा राहिला असताना मोठ्या नुकसानीचा सामना गेल्या महिन्यापासून या व्यवसायाला सहन करावा लागत आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करून टप्प्याटप्प्याने पक्ष्यांची विक्री करत आहेत. मात्र वैयक्तिक स्वरूपात काम करणाऱ्या कुक्कुटपालकांनी मोठ्या प्रमाणावर खर्च करून कोंबड्या तयार केल्या. आता मात्र मातीमोल दरात त्यांना विक्री करावी लागत आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे रोजगार अडचणीत आले आहेत. त्यामुळे सरकारने पोल्ट्री उत्पादकांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  नुकसानीचे स्वरूप 

  • चिकनच्या दरात प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत घसरण
  • खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक घटली
  • पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी 
  • मागणी नसल्याने ५० लाख पक्ष्यांचा अतिरिक्त साठा 
  • अतिरिक्त पक्षी शेडमध्ये साचल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ
  • बॅच लांबणीवर गेल्याने मजुरीत वाढ
  • प्रतिक्रिया गैरप्रचार होत असल्याने सुरुवातीला तोटा जाणवत नव्हता. पाण्याचा तुटवडा असल्याने अडचणी येत आहेत. त्यात उत्पादन काळ संपूनही उठाव नसल्याने अतिरिक्त मजुरी खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी व करार पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे. त्यामुळे दोन पैसे मिळवून देणारा व्यवसाय संकटात असल्याने रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे. - सतीश कुळधर, सायगाव, ता. येवला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT