शेतकरी जालिंदर गायकवाड यांच्या डाळिंब बागेला तेलकट डाग रोगाने असे पुरते घेरले आहे.
शेतकरी जालिंदर गायकवाड यांच्या डाळिंब बागेला तेलकट डाग रोगाने असे पुरते घेरले आहे.  
मुख्य बातम्या

तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरले

Abhijeet Dake

सांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून अधिक हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी डाळिंबाचा आंबे बहर २० ते २५ टक्के धरला जातो. या बहरातील डाळिंब सुमारे २५० ते ३०० ग्रॅमचे आहे. मात्र, बदलत्या वातावरणमुळे आंबे बहरातील सुमारे ५० टक्के डाळिंबाला तेकलट रोगाने घेरले आहे. यामुळे डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले आहेत. राज्यात खात्रीच्या पाण्याची सोय झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदाही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बागा धरल्या होत्या. स्वच्छ हवामानामुळे या बागांचे सेटिंगही चांगले झाले. डाळिंबाची फळे पेरूच्या आकाराची झाली आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक समाधानी होते. लवकर बहार घेतलेली डाळिंबे बाजारात दाखल झाली. दरही अपेक्षित मिळत होता. दर वाढण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू होती. मात्र, गेल्या महिन्यात हवामानात बदल झाला. ढगाळ आणि उष्ण वातावरणामुळे आद्रर्ता वाढत गेली. यामुळे तेलकट डाग रोग बागांत शिरला. गेल्या महिन्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव दिसत होता. अलीकडे अनेक बागांत तो पसरला आहे. उन्हाळी हंगामातील बहुतांश साऱ्याच बागांत कमी-अधिक रोग दिसत आहे. तो आटोक्‍यात आणण्यासाठी जीवाणूनाशकांची फवारणी शेतकरी करू लागले आहेत. तरी देखील रोग आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० हजार हेक्‍टरवर आंबे बहर धरला जातो. त्यापैकी ५० टक्के क्षेत्रावर तेलकट डागरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणजे सुमारे २५ ते ३० हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार असून, झालेला आर्थिक तोटा भरून निघणारा नाही. त्यामुळे शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सांगली जिल्ह्यात ७० टक्‍के बाधा  जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. या रोगाने किमान ७० टक्‍के इतक्‍या क्षेत्राला बाधा झाल्याचा अंदाज आहे; तर उर्वरित क्षेत्रातही पाच टक्‍क्‍यांपासून पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे.  प्रतिक्रिया माझी दीड हजार झाडे आहेत. दरवर्षी जुलैमध्ये बाग धरतो. तेलकट डाग रोग येतो, पण नियंत्रणात असतो. यंदा उन्हाळी हंगामात बाग धरली. चांगले सेटिंग झाले. मात्र रोगाने बाग घेरली आहे.  - जालिंदर गायकवाड, शेतकरी, शेटफळे, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT