‘मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक’
‘मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक’ 
मुख्य बातम्या

‘मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक’

माणिक रासवे

परभणी : विविध प्रकारच्या प्रदूषणमुळे मातीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडून जमिनीची सुपीकता कमी होत आहे. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सय्यद ईस्माइल यांनी दिली. जागतिक मृदा दिनानिमित्त बोलताना डॉ. ईस्माइल म्हणाले, की वाढते मृदा प्रदूषण थांबावे यादृष्टीने यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएओ) ‘बी द सोल्यूशन टू साॅइल पोल्यूशन’ (करून मातीचे रक्षण थांबेल प्रदूषण) ही संकल्पना आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा असंतुलित वापर, विविध कारखान्यांतून निघणारे टाकाऊ पदार्थ यामध्ये औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून सोडली जाणारी राख, साखर कारखान्यातील स्पेंट वाॅश, रासायनिक खतनिर्मिती कारखान्यातून निघणारे अॅसिड, मनुष्यनिर्मित टाकाऊ घटक, घनकचरा, प्लॅस्टिक, सांडपाणी आदी कारणांनी माती प्रदूषित होत आहे. नत्रयुक्त खतांच्या अतिरेकी वापरामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते. लहान मुलांमध्ये ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ विकृती आढळून येते. पिकांमधील नत्र स्थिरीकरण प्रक्रिया मंदावते. कीटकनाशके, तणानाशकांच्या असंतुलित वापरामुळे मातीमधील जैविक घटक तसेच इतर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. शहरातील टाकाऊ पदार्थ, घनकचरा, कर्करोगास कारणीभूत जड धातू आदी घटकांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. प्लॅस्टिकयुक्त कचरा जमिनीत गेल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बिघडले आहेत. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादकता कमी होते. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. मातीचा दर्जा सुधारण्यासाठी जैविकरीत्या विघटित होणाऱ्या घटकांचा वापर करावा लागेल, असे डॉ. ईस्माइल यांनी सांगितले. ''जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळखताचा वापर आवश्यक आहे. मातीचे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केली जाणार आहे.'' - डॉ. सय्यद ईस्माइल, विभागप्रमुख, मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र, वनामकृवि, परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT