The loss of crops in Ratnagiri district was eight crores, and five crores received
The loss of crops in Ratnagiri district was eight crores, and five crores received 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ कोटी, मिळाले पाच कोटी

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे आठ कोटींचे नुकसान झाले होते. त्या पोटी पाच कोटी रुपये नुकसान भरपाई वाटपासाठी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. ती प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ११ हजार ८९७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. आंब्याचेही ००.७० टक्के नुकसान झाले. काजूचे १३२.८ हेक्टर नुकसान आहे. एकूण ९ कोटी २३ लाखांचे नुकसान आहे. राज्यपालांनी भरपाई म्हणून भातशेतीला हेक्टरी ८ हजार रुपये जाहीर केले आहेत. त्यापैकी ५ कोटी जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. जिल्ह्यात भातशेती एकूण ७९ हजार १४६ हेक्टर आहे. त्यापैकी ११ हजार ८९७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ५४ हजार १९७ बाधित शेतकरी असून पंचनामे पूर्ण झाले.

जिल्ह्यात एकूण ११ हजार ८७४ हेक्टर भाताखालील क्षेत्र आहे. तर ४३ हेक्टर नागलीखाली क्षेत्र आहे. त्यात आंब्याचे नुकसान ००.७० टक्के झाले आहे. त्याचे पंचमाने पूर्ण झाले असून जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांचे १३२.८ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. १८ हजार प्रतिहेक्टर प्रमाणे २३ लाख भरपाई दिली जाईल.

पीक विम्याअंतर्गत ११२ शेतकरी पात्र ठरले आहेत. क्यार आणि महाचक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील ३ बोटींचे अंशतः नुकसान झाले. ४ हजार १०० प्रमाणे त्यांना १२ हजार भारपाई मिळणार. त्यात जिल्ह्यातील ७९ बोटींचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ९ हजार ६०० प्रमाणे ७ लाख ५८ हजार ४०० रुपये भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यातील ९४ मच्छीमारांचे १ हजार ४६२ मासेमारी जाळ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. २ हजार ६०० प्रमाणे त्याचे ३८ लाख २६६ एवढी भारपाई मिळेल.

शिवसेनेकडून आढावा 

जिल्ह्यातील परिस्थितीचा शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आढावा घेतला. ग्रामीण संस्थांचे खावटी कर्ज १ वर्षांसाठी माफ करावे. पीक गेल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकाप्रमाणे सर्वांना वर्षासाठी २ रुपये गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ द्यावेत. पुढील वर्षी शेतीसाठी सरकारने मोफत बियाणे द्यावे, नावीन्य पूर्ण योजनेत तशी तरतूद करावी, नुकसानभरपाई सरसकट मिळावी, खावटी कर्ज वर्षांसाठी माफ करावे, वर्षासाठी दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकाप्रमाणे गहू आणि तांदूळ सर्वांना द्यावे, या मागण्या राज्यपाल किंवा नवीन सरकारकडे करू, असे गिते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT