नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेताना डॉ. विजय भटकर 
मुख्य बातम्या

पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याची गरज : डॉ. विजय भटकर

टीम अॅग्रोवन

पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी आणि शासनाच्या अनेक अपेक्षा आहेत. शेतकरी विद्यापीठाचे तंत्रज्ञान समजून घेत शेतीत बदल करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, भविष्यात उत्पादनावरील खर्च कमी करून अधिक उत्पन्न वाढविण्याची गरज आहे, असे मत नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.     महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयात मंगळवारी (ता.१५) एकदिवसीय खरीप कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद् घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, कृषी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, कामधेनू विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य प्रतापराव भोसले, फलोत्पादन संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सोपान कासार, नियंत्रक विजय कोते, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी संशोधन संचालक विनय सुपे उपस्थित होते.  

या वेळी श्री. भटकर म्हणाले, की कृषी आणि संगणकाचा घनिष्ठ संबध आहे. कृषी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संशोधन वेगाने होत आहे. त्यामुळे कृषीक्षेत्रात रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. कृषी विद्यापीठाकडून नवीन संशोधन केले जात आहे. त्यासाठी आव्हानेही खूप आहेत. त्यावर मात करायची असेल, तर संशोधनाशिवाय पर्याय नाही. संशोधनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित पॉलिहाउस, नवीन अवजारे, यंत्रे विकसित होत आहेत. या माध्यमातून गावाचा विकास होण्याची देखील आवश्यकता आहे. यासाठी उन्नत भारत अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून कृषी विद्यापीठे व गावांतील शेतकऱ्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. त्यातून गावांचा विकास होणार आहे. 

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की बदलत्या हवामानामुळे पिके घेण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. एकीकडे दुष्काळ; तर दुसरीकडे अतिपाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने किमान बाजारभाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेतीवरील वाढत असलेला खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे.   यावेळी सहायक प्राध्यापक डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT