भूम जि. उस्मानाबाद : भूम येथे आयोजीत हल्लाबोल मोर्चानिमीत्त आयोजीत सभेला मार्गदर्शन करतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (छायाचित्र : अब्बास सय्यद)
भूम जि. उस्मानाबाद : भूम येथे आयोजीत हल्लाबोल मोर्चानिमीत्त आयोजीत सभेला मार्गदर्शन करतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (छायाचित्र : अब्बास सय्यद) 
मुख्य बातम्या

शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल : अजित पवार

टीम अॅग्रोवन

भूम, जि. उस्मानाबाद ः  शेतकरी मोडला तर राज्य उद्ध्वस्त होईल. बाजार उद्ध्वस्त होईल आणि राज्याचे आर्थिक कंबरडे मोडून पडेल. तसे होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे हल्लाबोल आंदोलन सुरू केल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

भूम येथे बुधवारी (ता. १७) हल्लाबोल मोर्चात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदींची उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, की राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ऑनलाइन घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच झाला नाही. शेतकरी, शेतमजुरांची अवस्था वाईट झाली आहे.ज्या जनतेने यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, तीच जनता यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन अधिकाऱ्यांनी तोडू नये, आमचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील वीज पंप देऊ, असे श्री. पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT