‘आजरा घनसाळ’चा गंध होणार दुरापास्त
‘आजरा घनसाळ’चा गंध होणार दुरापास्त 
मुख्य बातम्या

‘आजरा घनसाळ’चा गंध होणार दुरापास्त

Raj Chougule

कोल्हापूर : सुवासिक वाण म्हणून राज्यभर प्रसिद्धी असलेल्या आजरा घनसाळ भाताच्या वाणाला यंदा उत्पादन घटीचा फटका बसला आहे. घनसाळच्या एकरी उत्पादनात तीस टक्‍क्यांपर्यंत घट आली आहे. अतिवृष्टीमुळे भात फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच आडवा झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  आजरा घनसाळला भौगोलिक उपदर्शन (जी.आय. मानांकन) आहे. राज्यात प्रथम तर देशात आठवे मानांकन या आजरा घनसाळ भाताला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्‍यातील पंधरा ते वीस गावांमध्येच आजरा घनसाळचे उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यात सुमारे चारशे एकर क्षेत्रावर भात उत्पादन होते.  भाताच्या अन्य जातींच्या तुलनेत आजरा घनसाळ भाताची उंची जास्त असते. नेमकी हीच बाब यंदा नुकसानीस कारणीभूत ठरली. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आजरा तालुक्‍यात जोरदार वारे व सातत्याने अतिवृष्टी झाली. या दरम्यान या भाताची जोमाने वाढ सुरू होती. भात फुलोऱ्याच्या अवस्थेत येत असतानाच जोरदार वाऱ्यामुळे तो आडवा झाला. त्यातच शिवारात पाणी साचून राहिल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले. याचा मोठा फटका यंदा उत्पादनाला बसला. घनसाळचे उत्पादन एकरी पंधरा क्विंटलपर्यंत असते. ही जात स्थानिक असल्याने सुधारित जातींच्या तुलनेत एकरी उत्पादन कमी असते. यंदा भाताची विक्री शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु उत्पादनात एकरी पाच क्विंटलपर्यंत घट येत असल्याचे आजरा बाजारपेठेतील सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी भाताची विक्री करण्यासाठी गर्दी असते. परंतु यंदा हंगामाची सुरुवात तुरळक प्रमाणात झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT