पाऊस नसल्याने पिकांना तुषार सिंचनाव्दारे पाणी द्यावे लागत आहे
पाऊस नसल्याने पिकांना तुषार सिंचनाव्दारे पाणी द्यावे लागत आहे 
मुख्य बातम्या

नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच अपेक्षित पाऊस न झाल्याने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे धान रोवणी कामांवरही परिणाम झाला असून, या स्थितीचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.

कृषी विभागाकडील माहितीनुसार, गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत १२२.३ टक्‍के म्हणजेच ४०८.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ७३.६ टक्‍के म्हणजेच २४५.८ मिमी पाऊस विभागातील सहा जिल्ह्यांत बरसला. सर्वांत कमी १६६.९ मिमी पावसाची नोंद वर्धा जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यात पावसाची सरासरी २८५.५ मिमी असते. सरासरीपेक्षा कमी पाऊस या जिल्ह्यात झाला आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन तसेच संत्रा लागवड होते. नागपूर विभागात ७.६४ लाख हेक्‍टरवर म्हणजेच केवळ ३९.६३ टक्‍के क्षेत्रावरच खरिपाची पेरणी होऊ शकली. उर्वरित क्षेत्रावर अद्यापही पेरणी झाली नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

फळपिकांची अवस्था बिकट नागपूर, अमरावती विभागात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने फळ पिकांच्या अवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. नागपूर विभागात सुमारे साडेतीन हजार हेक्‍टरवरील बागा पाण्याअभावी जळाल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अपुरे पाणी आणि वाढत्या तापमानामुळे १२ हजार हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले. या संपूर्ण क्षेत्रात आता नव्याने लागवड करावी लागणार आहे. सरकारने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी हेक्‍टरी १८ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, त्यासंबंधीचे आदेश अद्यापही निघाले नसल्याने ही मदत केवळ घोषणाच ठरते की काय? अशी भीती फळबागधारकांच्या मनात आहे.     ...अशी आहे स्थिती नागपूर ः जिल्ह्यात २,५०,०२० हेक्टर म्हणजेच ५१.१३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. सुरवातीला पडलेल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर मात्र सोयाबीनची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सोयबीनचे क्षेत्र ४८,८२७ हेक्‍टर आहे.  भंडारा ः जिल्ह्यात १०, ५८९ हेक्टरवर म्हणजेच ५.२० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली असून, ५० टक्‍के क्षेत्रावर धानाच्या रोपवाटिका टाकण्याचे काम झाले आहे. परंतु, पाण्याअभावी धान रोवणी रखडली आहे.  चंद्रपूर ः जिल्ह्यात १२०२ हेक्‍टर क्षेत्रावर धान रोवणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण १,७४, ९७६ हेक्‍टर म्हणजेच ३९.०४ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गोंदिया ः जिल्ह्यात भात पिकाची ४४३९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६१८७ हेक्टर म्हणजेच ३.३३ टक्के क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे.  गडचिरोली ः जिल्ह्यात २०,४०२ हेक्‍टर म्हणजेच १२.१६ टक्‍के क्षेत्रावर पेरणी पूर्णत्वास गेली आहे. १३,६७२ हेक्‍टर क्षेत्रावर फेकीव भात, तर १७९ हेक्‍टर क्षेत्रावर भाताची रोवणी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT