अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकट
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकट 
मुख्य बातम्या

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकट

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अवकाळी पावसामुळे अगोदरच चार जणांना जीव गमवावा लागला. तोच पुन्हा तीन जणांच जीव गेले. याबररोबरच मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे व शेतमालाचेही नुकसान झाले. दुष्काळासह अवकाळीचे दुहेरी सकंट ओढवल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.   मंगळवारी (ता. १६) जिल्ह्यातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यांत अवकाळी पाउस झाला. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेचा कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. त्या वेळी गावाच्या उत्तरेला न्याहाराई माता मंदिराचे पुजारी संपत उदार (६५) या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी भागांत दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. योेगेश बापू शिंदे (३२) हा तरुणांचा अंगावर वीड पडून मृत्यू झाला. मेंढ्या चारत असताना त्याने पावसामुळे झाडाखाली थांबला होता. देवळा तालुक्यातील वाजगाव येथेही हौसाबाई कुंवर (७१) या वीज पडल्याने जागीच ठार झाल्या. त्यांच्या शेजारी बांधलेली शेळीदेखील दगावली. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीचाही मृत्यू झाला. 

दिंडोरीत पॉलिहाउसचे नुकसान

दिंडोरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जानोरी, मोहाडी परिसरातील सुनीता संजय गोवर्धने व रामदास मौले यांचे पॉलिहाउसचे मोठ्या प्रमाणावर झाले. तलाठी व कृषी विभागाने याबाबत पंचनामे केले. शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वीजपुरवठा ३६ तास बंद

येवला तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर, ममदापुरसह १० गावांतील वीजपुरवठा वादळी वाऱ्यामुळे ३६ तास खंडित होता. वादळी वाऱ्याने मेनलाइन ब्रेक डाऊन होती. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा गारपीट झाली. टरबूज, डाळिंब यांचे मोठे नुकसान झाले. 

सात जणांचा मृत्यू, २१ घरांची पडझड

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात कमालीचा बदल होत आहे. रविवारी (ता. १४) दिंडोरी तालुक्यात तीन व चांदवड तालुक्यात एक अशा चौघांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसाने सटाणा, मालेगाव, सिन्नर, नाशिक व निफाड तालुक्यांमधील ६८ गावे बाधित झाली. सुमारे २१ घरांची पडझड होऊन नऊ जनावरे दगावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT