औरंगाबाद : दसऱ्यापुर्वी कर्जमुक्‍त करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्‍तालयावर धडकलेल्या मोर्चात सहभागी शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी. छायाचित्र : सचिन माने.
औरंगाबाद : दसऱ्यापुर्वी कर्जमुक्‍त करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्‍तालयावर धडकलेल्या मोर्चात सहभागी शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी. छायाचित्र : सचिन माने. 
मुख्य बातम्या

दसऱ्यापूर्वी कर्जमाफी झाल्यास रब्बीसाठी कर्ज

मारुती कंदले

मुंबई : राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करूनही शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज मिळाले नाही. किमान रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. ११) मंत्रालयात भेटून केली.

या वेळी शिष्टमंडळात मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे आणि गुलाबराव पाटील आदी सहभागी झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र राज्य सरकारकडून केवळ आकड्यांचे खेळ आणि तारखांवर तारखा देणे सुरू आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना दसऱ्याआधी कर्जमुक्त करा या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. तसेच मुंबईत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर ७४ दिवस उलटले आहेत. प्रत्यक्षात, एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती. या घोषणेनंतर तातडीने हालचाली करून खरीप हंगामातच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अपेक्षित होते. मात्र, जाचक अटी आणि शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी यामुळे खरीप हंगाम संपत आला तरी कर्जमाफीची अंमलबजावणी अजूनही रडलेलीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकेने कर्ज दिले नाही, हे वास्तव मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले.

दरम्यान कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे. उर्वरित दिवसांत सर्व अडचणी दूर करून लाभार्थी ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून होतील आणि घोषणेप्रमाणे एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्जांच्या छाननीसाठी पंधरा दिवस लागतील. त्यानंतर दसरा ते दिवाळीपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे वर्ग केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

तीव्र आंदोलनाचा इशारा कर्जमाफीची घाेषणा करून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि आॅनलाइन अर्जाएेवजी आॅफलाइन अर्ज भरण्याची मुभा शेतकऱ्यांना द्यावी, या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने साेमवारी (ता. ११) राज्यभरातील विविध जिल्ह्यांत माेर्चा काढण्यात आला हाेता. तसेच मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. राज्यात पुणे, औरंगाबाद, हिंगोली, सातारा या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT