सोलापूर ः राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी (ता. २) अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते झाले.
सोलापूर ः राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी (ता. २) अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते झाले. 
मुख्य बातम्या

धारणा अन् धोरणं बदलली तरच शेतीत बदल

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः "शेती हे शास्त्र आहे आणि व्यवसायही आहे. त्याच पद्धतीने त्याचा विचार करुन शेती केली पाहिजे. पण मुळात ग्राहकांच्या धारणा आणि सरकारची धोरणं बदलायला हवीत, तरच शेतीत बदल होईल,'' असे मत `सकाळ-अॅग्रोवन''चे  संपादक आदिनाथ चव्हाण यांनी सोमवारी (ता. २) येथे व्यक्त केले.

लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा आणि महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषद, अकोलाच्या वतीने राज्यस्तरीय लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश करंडे अध्यक्षस्थानी होते. कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य डॉ. एस. डब्ल्यू. जहागिरदार, कृषी अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. राजेंद्र देशमुख, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, आयोजन समितीचे सचिव डॉ. रणजित पाटील, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव अनिता ढोबळे या वेळी उपस्थित होत्या. 

श्री. चव्हाण म्हणाले, मूलभूत सोईसुविधांचा अभाव, अपुरी वीज, शेतीमालाचे मार्केटिंग यांसारखे अनेक प्रश्‍न आज शेतीत आहेत. पीकपद्धतीत बदल नाही, मूल्यसाखळी नाही, त्यासंबंधीचे प्रश्‍न पुन्हा वेगळेच आहेत. दूध आणि साखरेमध्ये मूल्यसाखळी आहे, पण जादा पाणी उपशामुळे ऊसशेतीच्या नावाने ओरड सुरू असते. वास्तविक, वार्षिक ४० हजार कोटींची उलाढाल महाराष्ट्रात या उद्योगातून होते, याचा विचार कोणी करतच नाही. 

डॉ. महिंद्रे म्हणाले, शेतीच्या विकासात कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी एका रेषेत चालले पाहिजे, तरच शेती विकासाला चालना मिळेल.'' डॉ. करंडे म्हणाले, "शेतकऱ्यांना आता पिकवायचं सांगण्याऐवजी विकायचं कसं, हे सांगण्याची गरज आहे. शेतीतले ज्ञानाचे प्रवाह बदलले आहेत. पण मार्केटिंग हा मोठा विषय आहे. 

जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावी पैसेवारी

`आणेवारी-पैसेवारी'' याविषयावर कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. एस.डब्ल्यू. जहागिरदार म्हणाले, "आणेवारीतून आता पैसेवारीत आपण आलो आहोत. पण कालानुरूप पैसेवारीत काही बदल करणे आवश्‍यक आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात किमान सहा कापणी प्रयोग आणि भारी, मध्यम, हलक्‍या अशा जमिनीच्या प्रकारानुसार पैसेवारी काढली जावी, तरच या पद्धतीला अर्थ उरेल.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT