मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत पाणीटंचाई कायम
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत पाणीटंचाई कायम 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत पाणीटंचाई कायम

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान अजूनही टॅंकरवरच अवलंबून आहे. १२ लाख ५७ हजार ५२५ लोकांची तहान टॅंकशिवाय भागत नाही. सर्वाधिक ४१३ टॅंकर बीड जिल्ह्यात सुरू असून त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात १३७ टॅंकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्तांना पाणी पुरविले जात आहे. 

पावसाळ्याचा निर्धारित कालावधी संपला असला, तरी मराठवाड्यातील बहुतांश जलस्रोत अजूनही तहानलेलेच आहेत. अनेक भागांत भूगर्भात झिरपण्याइतपत पाणी न झाल्याने अजूनही विहिरी, कुपनलिकांना पाणी आले नाही. त्यामुळे टंचाईची स्थिती संपूर्ण पावसाळाभर सुरूच आहे. वार्षिक सरासरीच्या ८९ टक्‍के पाऊस झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ४७ गावांत अजूनही टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. गंगापूर तालुक्‍यातील ४१ व पैठण तालुक्‍यातील ६ गावांचा पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. या गावांमधील ९९ हजार ९७४ लोकांसाठी ३४ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. 

बीड जिल्ह्यातील २५८ गावे व ८८ वाड्यांना पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावत आहे. या गावे, वाड्यांमधील तब्बल ७ लाख १४ हजार ४७४ लोकांसमोर पाण्याचा प्रश्‍न आहे. तो सोडविण्यासाठी ४१३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सरासरी ६१ टक्‍केच पाऊस झाला. जो मराठवाड्यात सर्वात कमी आहे. आष्टी, पाटोदा, केज, बीड, अंबाजोगाई, शिरूर, धारूर आदी तालुक्‍यांतील गावात, पाटोदा, केज, आष्टी, शिरूर, परळी, वडवणी आदी नगर परिषदांच्या शहरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

लातूर जिल्ह्यातील ३४ गावे, एका वाडीमधील ९१ हजार १९० लोकांना पाणीटंचाई सतावते आहे. या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६९ टक्‍के पाऊस झाला आहे. येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ९४ गावे, ९ वाड्यांसमोर पाणीटंचाईचा प्रश्‍न आहे. ३ लाख ५१ हजार ८८७ लोकांसाठी १३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६९ टक्‍केच पाऊस झाला आहे. 

१३३६ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांतील १३२६ विहिरींचे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, बीडमधील ४४८, लातूरमधील २८१ व उस्मानाबादमधील ५८९ विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT