Wheat Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Production : दुष्काळामुळे भारतावर गहू आयातीची वेळ येणार?

Anil Jadhao 

मागील सलग दोन वर्षे भारताला गहू उत्पादकता घटीच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. २०२२ आणि २०२३ च्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील्याने उत्पादकता घटली. विशेष म्हणजे ऐन पीक भरण्याच्या काळात उष्णता वाढली होती. त्यामुळे त्याचा फटका जास्त होता. सलग दोन वर्षे उत्पादन घटल्याने जर यंदाही म्हणजेच तिसऱ्या वर्षी गहू उत्पादन घटल्यास भारताची गहू स्वयंपूर्णता धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

यंदा गहू बाजाराचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला विक्रमी भाव मिळत आहे. लागवडीच्या काळात चांगला भाव मिळल्यास त्या पिकाची लागवड वाढते. पण यंदा दुष्काळी स्थिती आणि पाणी टंचाईमुळे लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १० टक्क्यांनी कमी आहे. यामुळे गहू बाजारावरील सरकारचे निर्बंधही कायम राहण्याची शक्यता आहे.

गहू लागवडीचा कालावधी आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. मात्र यंदा गहू लागवडीचे चित्र फारसे आशादायक दिसत नाही. मागील हंगामात देशातील गहू उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे देशात गव्हाची टंचाई निर्माण होऊन भाव वाढत होते. हे लक्षात घेऊन सरकारने गहू निर्यात बंदी केली. गव्हावर स्टाॅक लिमिटही लावले. मात्र तरीही भाववाढ कायम आहे. सध्या गव्हाला बाजारात विक्रमी भाव मिळत आहे. साधारणपणे जेव्हा लागवडीच्या काळात भाव वाढलेले असतात तेव्हा त्या पिकाची लागवड वाढते. पण यंदा हे समिकरण दिसत नाही. त्याचे महत्वाचे कारण आहे दुष्काळी स्थिती. गहू पेरणीसाठी जमिनीत ओलावा आणि धरणे तसेच विहीरींमध्ये पाणीपातळी खालावलेली आहे.

भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयकडील गव्हाचा स्टाॅक दिवसेंदिवस कमी होत आहे. या महिन्याच्या सुरुवातील म्हणजेच १ नोव्हेंबरला गव्हाचा स्टाॅक पाच वर्षांतील निचांकी पातळीवर होता. त्यातच गव्हाचे उत्पादन घटल्यास भारताला गहू आयात करावा लागले. शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी करावी यासाठी सरकारने गव्हाच्या हमीभावात वाढ करून २ हजार २७५ रुपये केला. पण सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सरकारला यंदाही किती गहू खरेदी करता येईल, हे सांगता येत नाही.

देशात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे गहू लागवडीचे चित्र समाधानकारक दिसत नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या गहू उत्पादक मध्य प्रदेशात यंदा पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणाऱ्या हरभऱ्यासारख्या पिकाला पसंती दिली. त्यामुळे मध्य प्रदेशातील गहू लागवड यंदा किमान १० टक्क्यांनी कमी राहू शकते. तर उत्तर भारतातील हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेशात लागवड सरासरी राहू शकते, असा अंदाज आहे. 

यंदा एल निनोचे वर्ष आहे. ही स्थिती एप्रिल ते जून काळातही कायम राहण्याचा अंदाज काही हवामान संस्था व्यक्त करत आहेत. एल निनोच्या वर्षात रब्बी पिकांना प्रतिकूल वातावरणाचा फटका बसतो, याचा अनुभव आपल्याला याआधीही आला आहे. यंदाही हीच स्थिती राहू शकते. एल निनोच्या वर्षात डिसेंबर ते मार्च काळात तापमान सरासरीपेक्षा राहते. यंदाही ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास गहू उत्पादकतेला यंदाही फटका बसू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT