
Mumbai News : राज्यात वन्य पशू मानवी वस्ती आणि शेतात घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे वनक्षेत्राजवळील तसेच बफर झोनमधील जमिनी सरकार वार्षिक ५० हजार रुपये प्रति एकर दराने भाड्याने घेऊन त्यावर सौरऊर्जा प्रकल्प, बांबू लागवड, सुंगधी गवतांची लागवड करेल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आदींनी वन्यपशुंच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला होता. २०२२ ते २५ या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी आणि शेतीपिकांचे नुकसान होत आहे. संबंधितांना भरपाईही देण्यात येते.
पण, हे सर्व उपाय अपुरे ठरत आहेत. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे बफर झोन, वनाला लागून असलेल्या शेतीत पिके घेणे अशक्य होत आहे. वाघ, बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.
विदर्भात हा प्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने जंगला लगतच्या, बफर झोनमधील जमिनी वार्षिक एकरी ५० हजार रुपयांनी भाड्याने घेऊन त्या ठिकाणी शक्य असल्यास सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करणे शक्य नसल्यास तिथे बांबू लागवड करणे.
वन्यप्राणी खात नाहीत, पण, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पामरोझा सारखे गवत लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सौरऊर्जा कंपन्या आणि सुंगधी द्रव्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमवेत करार करण्यात येईल. असे झाल्यास शेतकऱ्यांना ठराविक रक्कम मिळेल. उदरनिर्वाहचा प्रश्न मिटेल, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.