Fraud
Fraud Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

फसवणुकीची कीड थांबणार कधी

टीम ॲग्रोवन

सांगली ः गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे (Fraud) प्रकार घडत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसतोय. त्यामुळे हळद उत्पादक (Turmeric Farmer) शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीची कीड कधी थांबणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यात द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरू असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होवू लागली आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील बावची येथील दहा शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने फसवले होते. त्याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांचे दार ठोठावले. ही घटना ताजी असतानाच सांगलीतील एका व्यापाऱ्याने वाई (जि. सातारा) येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अर्थात दोन महिन्यात शेतकऱ्यांना फसवणुकीची दुसरी घटना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे.

हळद उत्पादक शेतकरी सौद्यासाठी बाजार समितीत येतात. त्यामुळे बाजार समितीत फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत, असा दावा बाजार समितीने केला आहे. मात्र, याच बाजार समितीतील व्यापारी अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून हळदीची खरेदी करू लागले असल्याचेही सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर सौद्यापेक्षा पाचशे-हजार रुपये प्रतिक्विंटलला अधिकचा दर व्यापारी देतात. याच अधिक मिळणाऱ्या दराला शेतकरी भुरळतात. व्यापारी शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करतात. जो दर ठरला आहे, त्याप्रमाणे ३० ते ४० टक्के रक्कम शेतकऱ्याला बांधावरच देतात. उर्वरित रक्कम काही दिवसांची देतो, असे आश्वासन देतात. रक्कम मिळत नसल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी तगादा लावतात. मात्र, व्यापारी शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तरे देतात. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या लक्षात येते की, आपल्याला व्यापाऱ्यांनी फसवले आहे. त्यानंतर शेतकरी थेट पोलिस स्टेशनला जाऊन आपली फसवणूक झाली असल्याचा गुन्हा दाखल करतात. त्यानंतर शेतकरी पोलिस स्टेशनला हेलपाटे मारतात. केवळ ही तक्रार कागदावरच राहते. शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही.

व्यापाऱ्यांची बाजार समितीमध्ये नोंदणी असते. परंतु बाहेर खरेदी केलेल्या मालावर बाजार समितीचे नियंत्रण नसते. त्यामुळे व्यापारी फसवणूक करण्यासाठी तयारच असतात. शेतकऱ्यांनी बाजार समितीत सौदा केला, त्याठिकाणी फसवणूक झाली असेल तरच शेतकऱ्यांना त्याचे संरक्षण मिळते. त्यामुळे बाहेर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बंधन कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आर्थिक गुन्हा दाखल व्हायला हवा आणि अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती झाली तरच फसवणुकीचे प्रकार घडणार नाहीत.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर लगाम बसवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कायद्यात दुरुस्ती करून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आर्थिक गुन्हा दाखल केला पाहिजे.
महेश खराडे, जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT