Cotton Market
Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल?

Team Agrowon

Cotton News : देशातील कापूस उत्पादनात (Cotton Production) यंदा मोठी घट झाली. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा देशातील कापूस उत्पादन  २९८ लाख टनांवर स्थिरावेल, अशा अंदाज जाहीर केला. मागील हंगामातील कापूस उत्पादन ३०७ लाख गाठींवर स्थिरावले होते.

एप्रिल महिन्यातील अंदाजात देशातील उत्पादन ३०३ लाख गाठींपर्यंत होईल, असा अंदाज व्यक्त करण्याता आला होता. तर मे महिन्यातील अहवालात उत्पादनात पुन्हा ५ लाख गाठींची कपात करण्यात आली.

कापूस उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सातत्याने सांगत आले. पण उद्योगांनी हंगामाच्या सुरुवातीपासूनच विक्रमी उत्पादनाची री ओढली होती. पण आवकेचा हंगाम जसजसा पुढे गेला तसतसे उत्पादनातील घट स्पष्ट होत गेली.

उद्योग, व्यापारी, जिनिंग, सुतगिरण्या तसेच आयातदार (Importer) आणि निर्यातदारांची संघटना असलेल्या काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याचे स्पष्ट केले.

यंदा गेल्या १५ वर्षातील निचांकी कापूस उत्पादन झाले. त्यामुळे यंदा चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण उद्योगांकडून सातत्याने भाव दबावात  ठेवण्यात आले. मागील हंगामात मार्च महिन्यात कापूस दरात चांगली वाढ झाली होती.

मे महिन्यात कापूस ९ हजार रुपयांच्या दरम्यान होते. नंतर कापसाने १० हजार आणि १२ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. गेल्या हंगामातील दर पाहून यंदाही दरात सुधारणा होईल, अशी आशा होती. हंगामाच्या सुरुवातीला कापूस दर हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.

त्यामुळे पुढील काळात आणखी दर वाढतील ही आशा बाळगून शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. पण मार्चनंतर कापसाच्या दरावर दबाव येत गेला. देशातील बाजारात पहिल्यांदाच मे महिन्यात हंगामातील निचांकी भाव मिळत आहे.

कापसाच्या दरात मोठी घट झाल्याने शेतकरी मात्र अडचणीत येत गेले. कापसाचे भाव दबावात आल्याने शेतकरीही कापसाची विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा असताना भाव वाढत नाहीत. त्यामुळे शेतकरी कापूस विकत आहेत.

सध्या बाजारातील आवक मे महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे. सध्या बाजारात सरासरी ८० हजार गाठींची आवक होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशात एप्रिलपर्यंत २५९ लाख गाठी कापूस बाजारात आला.

म्हणजेच ३९ लाख गाठी कापूस बाजारात यायचा आहे. यापैकी शेतकऱ्यांकडे ३० लाख गाठींच्या दरम्यान कापूस होता, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत होते. तसेच सध्या बाजारात येणारा कापूस शेतकऱ्यांचाच आहे.

यामुळे या महिन्यांच्या शेवटी बाजारातील कापूस आवक कमी होऊ शकते, असा अंदाज आहे. कारण पावसाळा तोंडावर आल्याने आर्थिक नड असलेले शेतकरी कापूस विकत आहेत. शेतकरी पावसाच्या तोंडावर कापूस विकतील.

शेतकऱ्यांना आर्थिक नड, साठवणुकीची समस्या असते. त्यामुळे शेतकरी पावसाच्या आधी कापूस विकतील, हे उद्योगांना माहीत होते. तसेच मागील दोन महिने कापसाचे भाव दबावात असतानाही शेतकऱ्यांची विक्री सुरु होती.

 त्यामुळे देशात कापूस बाजार टिकून राहण्यासाठी चांगले फंडामेंटल्स असतानाही दर दबावात राहीले. उद्योग फायद्यात सुरु असतानाही शेतकऱ्यांकडून मात्र कमी भावात कापूस घेण्यात आला.

यंदा शेतकरी कापूस विक्रीसाठी दोन ते तीन महिने थांबले. एरवी डिसेंबरपर्यंत होणारी आवक मे महिन्यापर्यंत गेली. पण शेतकऱ्यांची अपरिहार्यता ओळखून बाजारात भाव दबावात ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना कापसातील तेजीपासून वंचित ठेवण्यात आले.

शेतकऱ्यांना मे महिन्यात चांगला भाव मिळाला तर वर्षी शेतकरी कापूस मागे ठेवतील. कापसाला दरवर्षी चांगला भाव द्यावा लागेल. तसेच कापूस खरेदी विक्रीचे नियोजन बदलेलं. यामुळेच कापसाचे भाव दबावात ठेवण्यात आले, असे अनेक जाणकारांनी सांगितले.

आता मे नंतर बाजारातील आवक एकदम कमी होईल. त्यानंतर दरात तेजी आली तरी याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. कारण शेतकऱ्यांनी दरवाढीची वाट पाहून कापूस विकलेला असेल.

सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या बाजारातील आवकही सरासरीपेक्षा जास्त आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडी कापूस संपेल.

काही शेतकरी थांबतील. पण त्याचे प्रमाण कमी असेल. आवक कमी झाल्यानंतर बाजारातील दरही सुधारतील. तसेच एल निनोचा माॅन्सूनवर परिणाम झाल्यास पुढील हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता असेल. मात्र नेमकी परिस्थिती ऑगस्ट नंतरच स्पष्ट होईल.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT