Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी दिलासा

Maharashtra soybean farmers : राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली.

बाळासाहेब पाटील

Maharashtra News : राज्यात बारदान्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली. सोमवारी (ता. १३) सायंकाळी उशिरा पणन महासंघाला पत्राद्वारे केंद्रीय कृषी मंत्रालयाने कळविले असल्याची माहिती महासंघाचे प्रभारी एमडी अप्पासाहेब धुळाज यांनी दिली.

राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असले तरी खुल्या बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकरी आग्रही आहे. मात्र, ‘नाफेड’ने १२ टक्के ओलाव्याची अट घातल्याने आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या सात लाख ४९ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ५ हजार ५३९ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात १५ टक्के ओलावा गृहीत धरून सोयाबीन खरेदी करावे, असे पत्र केंद्रीय कृषी मंत्रालयाने काढले. मात्र, ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली होती. परिणामी ऐन हंगामात आणि शेतकऱ्यांना गरज असलेल्या काळात सोयाबीन खरेदी होऊ शकली नव्हती.

अखेर उन्हामुळे सोयाबीनचा ओलावा घटत आल्यानंतर खरेदीला वेग येत असतानाच बारादाना संपल्याने गेल्या १६ दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद आहे. राज्यासाठी येणारा बारदाना अन्यत्र वळविल्याने सोयाबीन खरेदी होऊ शकली नव्हती.

अखेर राज्यात शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यानंतर पणन महासंघाने बारदाना खरेदीसाठी आग्रह धरल्यानंतर मागील आठवड्यात तीन दिवसांच्या नोटिशीवर टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. हा बारदाना आज (ता. १४ ) किंवा उद्या (ता. १५) तारखेपर्यंत मिळेल, असे सांगितले जात आहे.

मागील आठवड्यात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन सोयाबीन खरेदीला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनाही सुनावले होते. राज्यातील सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात राहिल्याने २ जानेवारी रोजीच राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाला पत्र पाठविले होते. मात्र, मुदत संपल्यानंतर दोन दिवसांनी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्र्यांच्या घोषणेला कात्री

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ८ फेब्रुवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात ३१ डिसेंबर अखेरपर्यंत सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे.

सोयाबीन खरेदी दृष्टिक्षेपात

शेतकरी नोंदणी : ७ लाख, ४९ हजार

खरेदी : २ लाख ५ हजार ५३९ टन

अपेक्षित खरेदी : ५ लाख ३८ हजार ६७४ टन

पहिल्या टप्प्यातील अपेक्षित खरेदी : १० लाख टन

दुसऱ्या टप्प्यातील अपेक्षित खरेदी : ४ लाख टन

एकूण खरेदी उद्दिष्ट : १४ लाख टन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT