Pomegranate
Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : राजस्थान, गुजरातमधील डाळिंब दिवाळीच्या दरम्यान बाजारात येणार

अभिजीत डाके

सांगली ः राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांत पाऊस झाला आहे. परंतु डाळिंबाच्या भागात (Gujrat Pomegranate Belt) फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे त्याचा फटका डाळिंबाला (Pomegranate) बसला नाही. त्यातच सध्या डाळिंबाला पोषक वातावरण (Favorable Weather Condition For Pomegranate) असल्याने डाळिंब पीक चांगले बहरले आहे. दिवाळीच्या दरम्यान, या दोन्ही राज्यांतील डाळिंब देशभरातील डाळिंब बाजारपेठेत (Pomegranate Arrival) येण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील डाळिंब महाराष्ट्रात विक्रीला आली तरी, दरावर फारसा परिणाम होणार नसल्याची शक्यता अखिल भारतीय डाळिंब संघाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या पाठोपाठ राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांत डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये १५ हजार हेक्टर तर गुजरात २० हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. वास्तविक पाहता, या दोन्ही राज्यांत दोन वर्षापर्यंत हस्त बहार धरला जायचा. परंतु, वातावरणातील बदलामुळे आता याठिकाणी अंबिया आणि हस्त बहरा धरण्यासाठी शेतकरी पुढे असल्याचे चित्र आहे. राजस्थान ६० टक्के हस्त तर ४० टक्के अंबिया आणि गुजरात ३५ टक्के हस्त आणि ६५ टक्के क्षेत्रावर अंबिया बहार धरला जातोय.

राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांत पाऊस झाला. परंतु दोन्ही राज्यांतील डाळिंब पट्ट्यात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे डाळिंब बागा वाचल्या आहेत. सध्या डाळिंब बागेस पोषक असे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी डाळिंब बागा उत्तम प्रकारे साधल्या आहेत. दिवाळीच्या दरम्यान, या दोन्ही राज्यांतील डाळिंब देशभरातील बाजारपेठेत विक्रीस येण्याची शक्यता आहे.

राज्यातील डाळिंब दरावर परिणाम नाही

वास्तविक पाहता, यापूर्वी राज्यात डाळिंब फारशी विक्री येत नव्हती. परंतु, गतवर्षी महाष्ट्रात अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची आवक घटली होती. परिणामी राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील डाळिंब विक्रीसाठी महाराष्ट्रात दाखल झाली होती. याचा परिणाम डाळिंब दरावर झाला होता. त्यामुळे याचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. यंदा या दोन्ही राज्यांतील डाळिंब राज्यात विक्रीला आली तरी, दरावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.

राजस्थान, गुजरातमध्ये वाढतेय डाळिंबाचे क्षेत्र

गेल्या वर्षी या दोन्ही राज्यांत डाळिंबाचे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टरपर्यंत होते. परंतु या दोन्ही राज्यांत पावसाचे प्रमाण जरी वाढले असले तरी, या भागातील डाळिंब पट्ट्यात डाळिंबाला गरजेइतकाच पाऊस पडत आहे. त्यामुळे या पावसाचा फारसा परिणाम डाळिंब लागवडीवर होत नसल्याचेही डाळिंब संघाने सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत एका वर्षात ५ हजार हेक्टरने लागवड वाढली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यात हळू हळू डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यांत डाळिंबाचे पीक चांगले आहे. यंदाही महाराष्ट्रात या दोन्ही राज्यातील डाळिंब विक्रीस येतील अशी शक्यता आहे. जरी डाळिंब विक्रीस आली तरी, त्याचा फारसा परिणाम आपल्या येथील डाळिंबाच्या दरावर होणार नाही.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT