Sugarcane  Agrowon
ॲग्रोमनी

Sugarcane: उत्तर प्रदेश सरकार राबवणार 'पंचामृत योजना'

शेतकऱ्यांचा ऊस लागवडीसाठीचा (Sugarcane Cultivation) खर्च कमी करणे, उत्पादकता (Productivity) वाढवण्यासाठी पंचामृत योजना राबवण्यात येत आहे.

Team Agrowon

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून आता 'पंचामृत योजना' (Panchamrut Yojana) राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राने ऊस लागवडीस प्रवृत्त करणे तसेच त्यांना इतर पिकांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शुगरकेन डेव्हलपमेन्ट डिपार्टमेंटच्या (Sugarcane Development Department) माहितीनुसार, सरकारने पंचामृत योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु केली असून सुरुवातीच्या टप्प्यात रब्बी हंगामासाठी २०२८ शेतकऱ्यांचे मॉडेल प्लॉट्स विकसित केले जाणार आहेत.

योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याचा एक प्लॉट सव्वा एकरचा असेल. असे कमाल १५ प्लॉट्स शुगरकेन डेव्हलपमेंट कौन्सिल्सकडून योजने अंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत योजना राबवण्यात येणार असून संबंधित जिल्ह्यांतील भौगोलिक पार्श्वभूमीनुसार पिकांचे नियोजन केले जाणार आहे.

गव्हाच्या कापनीनंतर शेतकऱ्यांना ऊस लागवडीस प्रवृत्त करण्यासाठी सध्या शुगरकेन डेव्हलपमेन्ट डिपार्टमेंटचे अधिकारी शेतकऱ्यांशी संपर्क करत आहेत. त्यांना आधुनिक तंत्राने ऊस लागवड कशी करायची, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऊस लागवडीशिवाय पंचामृत योजने अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना तेलबिया (Oil Seeds) ,कडधान्य (Pulses) आणि भाजीपाला लागवडीसाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शेतकऱ्यांचा ऊस लागवडीसाठीचा (Sugarcane Cultivation) खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवण्यासाठी पंचामृत योजना राबवण्यात येत आहे. ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, खोडवा व्यवस्थापन, जैविक आच्छादन, ठिबक सिंचन, आंतरपीक अशा पाच पद्धतीचा अंगीकार करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

सरकारने ऊस लागवडीसाठीच्या खर्चात बचत करण्यासोबतच पाण्याची बचत करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले. उसाचे पाचट जाळल्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पाचटाचा वापर खतनिर्मितीसाठी करणे, खते, रसायनांचा वापर कमी करणे, असे हेतू या योजनेच्या माध्यमातून साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पंचामृत योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 'उत्तम ऊस उत्पादक शेतकरी' पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT