Cotton Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : ‘सीसीआय’ची तेलंगणातच ७५ टक्के कापूस खरेदी

अनिल जाधव

Pune News : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून आता जास्तीतजास्त कापूस ‘सीसीआय’ खरेदी करेल आणि खुल्या बाजारातही कापसाचे भाव किमान हमीभावाच्या पातळीपेक्षा जास्त राहतील, अशी अपेक्षा होती.

पण राज्यातील शेतकऱ्यांना ‘सीसीआय’च्या खेरदीचा फायदा झाला नाही. सीसीआयने राज्यात आतापर्यंत फक्त १ लाख गाठींची खरेदी केली. तर शेजारच्या तेलंगणात १६ लाख गाठींची खरेदी झाली. राज्यात कमी कापूस खरेदी होण्यामागे मुख्य कारण आहे सीसीआयच्या जाचक अटी.

सीसीआयने १६ जानेवारीपर्यंत देशभरात २१ लाख २९ हजार गाठींची खेरदी केली. यामध्ये सर्वाधिक खरेदी झाली ती तेलंगणात. तेलंगणा सीसीआयने शेतकऱ्यांकडून १६ लाख गाठी कापूस खरेदी केला. म्हणजेच एकट्या तेलंगणात सीसीआयने ७५ टक्के कापूस खेरदी केला. इतर राज्यात केवळ २५ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त १ लाख गाठी कापूस सीसीआयला खरेदी करता आला. म्हणजेच सीसीआयच्या एकूण खरेदीपैकी केवळ ५ टक्के.

तसे पाहिले तर महाराष्ट्र कापूस उत्पादनात गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर असतो. पण एक नंबरच्या गुजरातमध्येही सीसीआयची खरेदी केवळ २० हजार गाठींची झाली. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सीसीआयच्या जाचक अटी, शर्तींचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांचा जास्तीतजास्त कापूस हमीभावापेक्षा कमी भावात विकला गेला.

सीसीआयने केवळ चार राज्यांमध्येच एक लाख गाठींपेक्षा जास्त कापूस खरेदी केला. तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील खरेदी एक लाख गाठी किंवा त्यापेक्षा काहीशी जास्त राहिली. पण आतापर्यंत तेलंगणानंतर फक्त आंध्र प्रदेशात १ लाख १७ हजार गाठींची खरेदी करण्यात आली. तेलंगणात कापसाचे भाव कमी होते. सीसीआयच्या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पण महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांना सीसीआयच्या खेरदीचा फायदा मिळालाच नाही.

निकषांची आडकाठी

गुजरात आणि महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीपासूनच भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहिली. सीसीआयच्या गुणवत्तेचा कापूस खुल्या बाजारातही हमीभावाच्या दरम्यान विकला गेला. पण पावसाने गुणवत्ता कमी झालेला कापूस सीसीआयने खरेदी केला नाही. तसेच पीक पेऱ्याची नोंद असलेला सात-बारा, शेतकऱ्याची हजेरी, तसेच गुणवत्तेचे निकष यामुळे सीसीआयची खरेदी महाराष्ट्रात कमी झाली. यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस कमी भावात विकावा लागत आहे.

सीसीआयचा बाजाराला आधार नाहीच

महाराष्ट्रात आता सीसीआयचे खरेदी केंद्र १०० हून अधिक आहेत. पण खरेदीच्या अटींमुळे शेतकरीही सीसीआयला कापूस विकण्याच्या भानगडीत पडताना दिसत नाहीत. त्यामुळे कापसाची खरेदी खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात केली जात आहे. त्यातच बाजारातील कापूस आवक १ लाख ८० हजार ते २ लाख गाठींच्या दरम्यान आहे. त्यातही सीसीआय खरेदीच्या स्पर्धेतून बाजूलाच असल्याचे दिसते. त्यामुळे बाजारावर दबाव आलेला दिसतो. सीसीआयने कापूस खरेदीचे निकष शिथिल करून खरेदी वाढवली तर कापूस बाजाराला किमान ७ हजारांचा बेस तयार होईल, असे अभ्यासकांनी सांगितले.

सीसीआयची राज्यनिहाय कापूस खरेदी (गाठींमध्ये)

तेलंगणा…१५,८६,१००

आंध्र प्रदेश…१,१७,१००

मध्य प्रदेश…१,०३,५००

महाराष्ट्र…१,०१,८००

कर्नाटक…५२,७००

ओडिशा…५१,५००

पंजाब…३७,४००

हरियाना…३४,९००

राजस्थान…२३,७००

गुजरात…२०,७००

तमिळनाडू…३००

इतर…२५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT