राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार 
इव्हेंट्स

राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार

टीम अॅग्रोवन

पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘सकाळ’ने कायम ठेवला. आज दुष्काळी स्थितीत पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यावर जागरूकपणे आम्ही काम करतो आहोत. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून लोकसहभागाच्या जोरावर आजपर्यंत ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला, असे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी (ता. ८) येथे सांगितले.  सकाळ- ॲग्रोवनच्या वतीने  ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड’चे वितरण बुधवारी झाले. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले की, केवळ शेती हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ॲग्रोवनसारखे दैनिक सुरू केल्यानंतर अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. पण आज त्याला मिळालेले हे यश महत्त्वाचे आणि सर्वांच्या सहभागाचे आहे. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्यात आणखी काही बदल हवे असतील तर शेतकऱ्यांनी त्यांच्या सूचना जरूर मांडाव्यात. त्यानुसार बदल केले जातील. सकाळ माध्यम समूह वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते आहे. पाण्याच्या विषयावर सकाळने रिफी फंडाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५०० ते ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. शेतकरी प्रशिक्षित व्हावेत, कौशल्याधारित शिक्षण त्यांनी घ्यावे, यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून चार लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यातही आले आहे.  ॲग्रोवनच्या माध्यमातून दरवर्षी सरपंच महापरिषद भरवली जाते. सरपंच शहाणा झाला तर गावाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे, हा यामागील उद्देश आहे. आत्तापर्यंत १० हजार सरपंचांना हे प्रशिक्षण दिले. त्यात महिला सरपंचांचाही सहभाग मोठा आहे. या कामात कोणतीही जात, धर्म असा भेदाभेद नसतो. केवळ समाजाचा उत्कर्ष, हाच उद्देश असतो. लोकांचा मिळालेला विश्वास आणि पाठिंबा हेच यामागील सर्वात मोठे बळ आहे, असेही श्री. पवार म्हणाले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT