दुष्काळात रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे, असे मत श्रीपतरायवाडी (जि. बीड) येथील श्रीकन्या जाधव यांनी व्यक्त केले.
दुष्काळात रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे, असे मत श्रीपतरायवाडी (जि. बीड) येथील श्रीकन्या जाधव यांनी व्यक्त केले.  
इव्हेंट्स

दुष्काळात रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे

टीम अॅग्रोवन

आळंदी, जि. पुणे : शेतीचा विकास पाण्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाला संधी समजून पाणलोटाची कामे केली पाहिजे. पाण्याबरोबरच मातीही अडवून पाणी जमिनीत मुरविण्यावर भर दिला पाहिजे. डोक्यावरचा हंडा उतविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा. दुष्काळात रडण्यापेक्षा लढायला शिकले पाहिजे, असे मत श्रीपतरायवाडी (जि. बीड) येथील श्रीकन्या जाधव यांनी व्यक्त केले.

अॅग्रोवनच्या वतीने आयोजित सरपंच महापरिषदेमध्ये श्रीकन्या जाधव बोलत होत्या. ‘सकाळ‘च्या सहयोगी संपादक (तनिष्का) वर्षा कुलकर्णी, बोरामणी,(जि. सोलापूर) येथील यशस्विनी अॅग्रो फार्मर कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे यांनीही मार्गदर्शन केले. श्रीकन्या जाधव म्हणाल्या, की दैनंदिन कामासाठी महिलांना सर्वाधिक पाण्याची गरज असते. घरगुती पातळीवर दुष्काळाची सर्वाधिक झळ महिलांना सोसावी लागते. याची जाणीव महिलांना करून दिल्यानेच महिलांनी पुढाकार घेऊन पाणलोट क्षेत्र विकासाची कामे केली. दुष्काळ असताना या कामातून गाव पाणीदार झाले. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीवर भर दिला आहे. त्यामुळे साडेतीनशे एकर शेती सिंचनाखाली येऊ शकली. गावातून होणारे स्थलांतरही आता थांबले आहे.

यशस्विनी अॅग्रो फार्मर कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे म्हणाल्या, की तनिष्काच्या माध्यमातून महिलांचे गट तयार करून त्यांना सकारात्मक ऊर्जा दिली. गावातील पाझर तलावातून सुमारे सोळा हजार ब्रास गाळ काढून, नापिक जमीन सुपीक केली. तलावातील पाणी संचयाची क्षमता ३६ हजार कोटी लिटर झाली. याचा फायदा सहा-सात गावांना झाला. लगतच्या दहा-बारा गावांतील महिलांचे ४५ शेतकरी बचत गट तयार केले. या गटांच्या माध्यमातून ६७५ महिलांनी एकत्र येत ‘यशस्विनी’ ही पहिली महिला अॅग्रीप्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. डाळ मील, क्लीनिंग अॅण्ड ग्रेडिंग मशिन घेतले. शेतकऱ्यांच्या शेतमाल स्वच्छ करून, चांगला भाव मिळवून दिला. इतरही महिलांनी घराबाहेर पडून नवीन संकल्पनांचा अभ्यास करावा. अडचणींवर मात करून पुढे गेले, तर यशाच्या शिखरावर पोचता येईल, असे माळगे यांनी सांगितले.

तनिष्का उपक्रमाबद्दल माहिती देताना कुलकर्णी म्हणाल्या, की स्त्रिया कर्त्या व बोलत्या झाल्या पाहिजे, या उद्देशाने तनिष्का उपक्रम सुरू झाला. पाच वर्षांत एक लाखाहून अधिक महिलांनी सहभागी होऊन गावागावांत क्रांती केली. एकटी महिला काही करू शकत नाही. मात्र, त्या एकत्र आल्या, तर मोठे काम करता येते, हे तनिष्कांनी दाखवून दिले आहे. राज्यातील अनेक सामाजिक प्रश्‍न त्यामाध्यमातून सुटले. जलयुक्त शिवारचा उल्लेख त्यासाठी आवर्जून करता येईल. तसेच, तनिष्काच्या सहकार्याने टाटा ट्रस्ट आणि गुगलच्या माध्यमातून सुमारे चार लाख महिलांना इंटरनेट साक्षर केले. प्रशिक्षण घेऊन या महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT