जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो, तसतसे वातावरणातील तापमान वाढत असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. तशी आपल्याकडे हिरव्या चाऱ्याची टंचाई ही पावसाळा वगळता इतर ऋतुत योग्य व्यवस्थापनाभावी नेहमीच असते. उन्हाळ्यात जनावरे हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे मिळेल तो हिरवा चारा, वनस्पती खाण्याचा प्रयत्न करतात. या विषारी वनस्पतीमध्ये बेशरम, घाणेरी, गुंज, धोतरा आणि गाजर गवत यांसारख्या वनस्पतींचा समावेश होतो.
हेही वाचा- चारा अति प्रमाणात दिल्याने जनावरांना होते विषबाधा
जनावरांनी या गवताचे सेवन अति प्रमाणात केल्यास त्यांना विषबाधा (poison) होते, जनावरांना गुंगी येते, ते खाली बसतात, खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरे पाय मारायला लागतात. तीव्रता जास्त असल्यास जनावरांचा मृत्यु होण्याचा संभव असतो.
हेही पाहा- युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी आवश्यक
महाराष्ट्रात (maharashtra) १९७०-७२ पासून या गवताचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्रात गाजर गवताला पांढरी फुली, चटकचांदणी आणि ओसाडी या नावाने संबोधले जाते. गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टोरोफोरस (Parthenium Historeforus) हे आहे. याची पाने गाजराच्या पानासारखी चिरलेली असतात, त्यामुळे त्याला गाजरगवत हे नाव पडले आहे. गाजरगवताच्या झाडांना मोठ्या संख्येने फुले येतात. त्यापासून हजारो बिया तयार होऊन त्याचा प्रसार होत असतो. या गवताचा प्रसार शेतावरील बांध, पडीत जमीन, चराऊ कुरणे, नदी-नाले याभागात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. दुभत्या जनावरांनी गाजर गवत खाल्ल्यास दुधाची चव बदलते, आणि गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो. गाजर गवतामध्ये पारथेनिन नावाचा विषारी घटक आढळून येतो.
हेही पाहा-स्वच्छता राखा, अन्नविषबाधा रोखा
लक्षणे
प्रतिबंधात्मक उपाय-
उपचार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.