Phosphorus deficiency in animal
Phosphorus deficiency in animal  
कृषी पूरक

गायीचे मायांग तिरके का होते?

टीम अॅग्रोवन

गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे प्रमाण वाढते.  बाहेर पडणारा सोट हा पाण्यासारखा असतो म्हणजे चिकटपणा खूप कमी असतो.  या सोटामध्ये हवेचे बुडबुडे असतात. कृत्रिम रेतन केल्यानंतर हात बाहेर काढल्यानंतर हवा गुदद्वारातून आत ओढली जाते. फॉस्फरस ची कमतरता असलेल्या गायीमध्ये तिचे मायांग हे तिरके झालेले असते जे की उभे असायला हवे असते. हवा आत ओढून-ओढून ते तिरके झालेले असते.

शेण टाकल्यानंतर फर फर आवाज येत असेल तर ती फॉस्फरसची (Phosphorus) कमतरता आहे असं समजावं.  तिरक्या मायांगमुळे शेण टाकताना ते मायंागला चिकटले जाते व त्यामुळे शेणामधील बॅक्टेरिया (Bacteria) गायीच्या गर्भाशयात प्रवेश करतात व त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन गाय गाभण राहत नाही. अशा परिस्थितीत कितीही अँटिबायोटिक वापरल्या तरी गाय गाभण राहत नाही कारण संसर्ग  पुन्हा पुन्हा होत असतो.  फॉस्फरसच्या कमतरतेमुळे जनावर गाभण राहत नाही. फॉस्फरसची कमतरता ही एका दिवसात होत नाही, फॉस्फरसची कमतरता शरीरात हळू हळू होत असते व ती होण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच प्रमाणे फॉस्फरस ची कमतरता भरून निघण्यासाठी कमीत कमी १०-१५ दिवस लागतात. जनावरांना चाऱ्या मधून फॉस्फरस मिळत असते त्यामुळे जो चारा आपण पिकवतो त्याला सुपर फॉस्फेट खत म्हणून टाका.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT