Livestock market
Livestock market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : जनावारे बाजारांवर चार दिवसांत निर्णय

टीम ॲग्रोवन

मुंबई : लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले जनावरांचे बाजार (Livestock Market) येत्या चार दिवसांत सुरू होणार आहेत. लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात आल्याने आणि बहुतांश जनावरांना लसीकरण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बाजाराला परवानगी देण्यात येणार आहे. या बाबतचे परिपत्रक काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने (Animal Husbandry Department) विधी व न्याय विभागाला फाइल पाठविली असून, येत्या दोन दिवसांत त्याबाबतचे सविस्तर परिपत्रक निघणार आहे.

राज्यात गोवंशाला लागण होत असलेल्या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. तसेच जनावरांचे आठवडी आणि जत्रा- यात्रांमधील बाजार बंद करण्यात आले होते. राज्यात आतापर्यंत १४ हजार ६१२ गोवंशाचा मृत्यू झाला आहे.

मृत जनावरांना ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गायीसाठी ३०, बैलासाठी २५, तर वासरांचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची भरपाई दिली जात होते. तसेच ‘लम्पी स्कीन’चा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात भरती केली होती. त्यामुळे लसीकरणाचा वेगही जास्त असल्याचा दावा पशुसंवर्धन विभाग करत आहे.

या आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याने ८ सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून जनवारांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार थंडावले होते. काही ठिकाणी घरगुती स्तरावर जनावरांची खरेदी - विक्री होत होती. मात्र बैलांच्या खरेदीमुळे अनेक ठिकाणी ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी अनेकांनी खरेदी बंद केली. त्यामुळे आठवडी बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठी झळ बसत होती.

तसेच हा आजार म्हशीला होत नसल्याने किमान म्हशींच्या खरेदी विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी होत होती. मात्र सरसकट वाहतूक बंदी असल्याने म्हशींच्या खरेदी विक्रीला फटका बसला होता. शेतकऱ्यांना दुधाळ म्हशी खरेदी करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या म्हशी विक्री करताही येत नव्हत्या.

या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर निवेदने येत होती. या निवेदनांच्या पार्श्‍वभूमीवर ‘लम्पी’चा आढावा घेऊन सध्याची आकडेवारी पाहता राज्यातील दोन लाख २१ हजार ८२६ बाधित जनावरांपैकी १ लाख ५२ हजार ११४ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. त्यामुळे जनावारांचा बाजार सुरू करण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे.

लसीकरण पूर्ण झालेले जिल्हे

जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशीम, जालना, हिंगोली, नंदूरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांत पूर्ण लसीकरण झाले आहे.

आज टास्क फोर्सची बैठक

लम्पी स्कीन आजाराबाबत आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे शुक्रवारी (ता. ११) बैठक होणार आहे. या बैठकीला पशुसंवर्धन आयुक्त ज्या जिल्ह्यांमध्ये मृत जनावरांचा आकडा आहे, त्या १० जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बाजार सुरू करण्यासाठी नियमावली

- जनावरांच्या वाहतुकीला आणि बाजारासाठी स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेणार

- जनावरांचे लसीकरण २८ दिवसांपूर्वी होणे गरजेचे

- म्हशींच्या वाहतूक आणि बाजारासाठी परवानगीची गरज नाही

- जिल्ह्यांतर्गत वाहतूक करण्यास परवानगी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT