Snail Control
Snail Control  Agrowon
ॲग्रो गाईड

Snail Control : पहिल्याच पावसात करा शंखी गोगलगायीच्या नियंत्रणाचे नियोजन

Team Agrowon

Soybean Snail Control : सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पहिलाच पाऊस झाला असेल. पहिला पाऊस झाला की शंखी गोगलगायी (Snail) सक्रीय होतात त्यामुळे पहिला पाऊस झाला की या गोगलगायीच्या नियंत्रणाच नियोजन करावं.

मराठवाड्यात मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. यामध्ये लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील १ लाख ६ हजारावर शेतकऱ्याचे ६३ हजार ८७० हेक्टर पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

शंखी गोगलगायी अतीथंड व अतिउष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्र्याने बंद करुन झाडाला किंवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत जातात. गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होते. 

येणाऱ्या हंगामात मागील वर्षी प्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करुन हा उपद्रव पुर्णपने दूर होत नाही. तर सामूहिकरित्या उपाययोजना करण्याची गरज असते.

त्यामुळे ज्याठिकाणी पहिला पाऊस पडला आहे त्याठिकाणच्या  सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या मोहीम राबवून नदी, नाले, ओढे, ओहळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भागात सुप्तावस्थेत असलेल्या गोगलगायी गोळा करुन नष्ट कराव्यात.  

मागील वर्षीच्या गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत. 

शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत ८ किलो प्रती एकर याप्रमाणे तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा गोगलगायींना शोतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नयंत्रणासाठी टाकावा. 

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १ किलो मोरचूद अधिक १ किलो चुना १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेली १० टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. 

याव्यतिरिक्त अंड्याच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख,तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर चा वापर गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो. 

सायंकाळी किंवा सुर्योदयापुर्वी शेतातील गोगलगायी हातमोजे घालून आणि तोंडावर मास्क लावून गोळा करुन नष्ट कराव्यात. 

जैविक व्यवस्थापनामध्ये एकरी ८ किलो निंबोळी पावडर, एकरी २० किलो निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायींना शेतात येण्यापासून रोखता येईल. अशाप्रकारे आत्तापसूनच एकत्रितपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास खरीपात शंखी गोगलगाईमुळे होणारे नुकसान टाळता येईल.  

माहिती आणि संशोधन - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Disqualified : पाच लाख शेतकरी पीकविम्यातून अपात्र

Maharashtra Rain : परभणी, हिंगोलीतील सात मंडलांत कमी पाऊस

Water Scarcity Over : पाणीटंचाईचा वनवास संपला

Kharip Crop Loan : खरिपाचे कर्जवाटप पन्नास टक्क्यांच्या पुढे

Pik Bima Yojana : पिक विमा योजनेची अंतीम तारीख ठरली, सामुहिक सेवा केंद्रांनी जादा रक्कम घेतल्यास होणार कारवाई

SCROLL FOR NEXT