Organic Farming
Organic Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Organic Farming : हिरवळीच्या खताचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

राज्यातील अनेक विभागांमध्ये मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. यावर मात करून जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीची खते (Green Manuers) मोलाची ठरतात. हिरवळीची खत पिके ही जमिनीत हेक्टरी साधारणत: ६०-८० किलोपर्यंत नत्र स्थिरीकरणाचे काम चांगल्या पद्धतीने करतात. मात्र काही ठिकाणी या हिरवळीच्या खतांचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं. त्यामुळे हिरवळीच्या खताचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीची खतं व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.

हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढतं. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढत, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.

नुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावं.

कमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.

हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकते.

ताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून, पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावं. हे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल वाढत असलं, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही. तसच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.

हिरवळीच्या खताचा चांगला फायदा होण्यासाठी ती कोणत्याही जमिनीत वेगाने, भरपूर वाढणारी असावीत. पीक लवकर कुजणार रसरशीत व तंतूचं असावं. हिरवळीचं खत शक्यतो शेंगवर्गीय कुळातील मुळांवर जास्त गाठी असणारं असावं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT