Crop Protection
Crop Protection Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : अतिपावसात फळबागेची घ्यावयाची काळजी

Mahesh Gaikwad

दत्तात्रय ढिकले

सतत पडणारा पावसामुळे जमिनीला वाफसा येत नाही. सध्या मध्ये काही वेळा कडक उन्हे पडताना दिसतात. या तीव्र उन्हामुळे (Temperature) माती तापून त्यातील ओलावा उष्ण वाफेच्या स्वरुपात बाहेर पडतो. या वाफेचा आघात प्रथम वनस्पतींच्या मुळांवर (Plant Root) होतो. मुळे कोमजून मातीतून अन्नद्रव्यांची (Soil Nutrient) उचल खंडीत होते. परिणामी नांवर विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व विकृती दिसू लागतात. परिणामी फुल व फळगळ दिसून येते.

अशा वेळी त्यापासून बचावासाठी केवळ फवारणी किंवा खते देण्याचे नियोजन कोणत्याही अभ्यासाविना शेतकरी करत असतात. त्यामुळे केवळ खर्चातच वाढ होते असे नाही, तर उत्पादनातही घट होते. पुढील प्रकारे काही उपाययोजना किंवा टीप्स बहुतांश शेतकऱ्यांना सर्व पिकांमध्ये राबवता येतील, असे मला वाटते.

१) बुरशीनाशकांची फवारणी करण्यापूर्वी पाण्याचा सामू हा ५.५ ते ६.५ च्या दरम्यान करून घ्यावा. त्यानंतर त्यात बुरशीनाशक योग्य प्रमाणात मिसळून सकाळच्या वेळी फवारणी करावी.

२) अशाच प्रकारे पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ करून घेतल्यानंतर त्यात कीटकनाशक मिसळून त्याची फवारणी सायंकाळी करावी. सायंकाळी बहुतांश किडीच्या अवस्था अधिक कार्यरत होतात. त्यांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

३) विनाकारण एकापेक्षा जास्त रसायने एकत्र करणे टाळावे.

४) उच्च गुणवत्तेचे व्हर्मीवॉश (गांडूळ पाणी) व काळा गूळ यांची एकत्रित फवारणी केल्यास पानांना मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. तसेच पानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून फुलगळ थांबते.

५) एकापेक्षा जास्त रसायने एकत्र करताना त्यांची कॉम्पटॅबिलिटी माहित करून घ्यावी. तसेत त्यातील कोणते पहिले मिसळायचे आणि कोणते दुसरे मिसळायचे, हे माहीत असणे गरजेचे.

उदा : बोर्डो मिश्रण तयार करताना आपण प्रथम पाण्याचा सामू काढून त्यात मोरचूद मिसळावे. त्यानंतर चुना मिसळावा. योग्य पद्धतीने मिश्रण तयार केले तर चांगले परिणाम मिळतात.

६) शक्यतो लागवडी पूर्वी शेतात पाणी साचू नये, या उद्देशाने मशागतीवेळीच मातीला उतार करून घ्यावा. पुढेही पावसाचे साचलेले पाणी वेळीच बाहेर काढून द्यावे. यामुळे लवकरात लवकर वाफसा होण्यास मदत होईल.

७) शेतीचे सर्वच बांध विशेषतः उताराकडील बांध मजबूत असावेत. या बांधावर गवत असू द्यावे. गवताच्या मुळांचे जाळे जास्तीत जास्त घट्ट असणे गरजेचे असते. त्यामुळे शेताच्या बांधावर कधीही तणनाशकांची फवारणी करू नये. असे केल्याने बांध ठिसूळ होतात. अति पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतात. या पाण्यासोबतच शेतातील सूक्ष्मजीवयुक्त माती वाहून जाऊन आपली माती निकस बनते.

८) ठिबक संचाचा वापर करताना लॅटरलमधील पाणी तापलेले असताना सिंचन करू नये. एका ड्रीपरपासून दुसऱ्या ड्रीपरपर्यंत पाइपच्या आकारमानानुसार ६० ते १०० मिलि गरम पाणी साचते. हे गरम पाणी पिकांच्या कोवळ्या मुळांवर अल्प कालावधीमध्येही आघात करते. त्यामुळे शक्यतो सकाळ लवकर पाणी व पाइप थंड असतानाच पाणी द्यावे. झाडेही सकाळी कार्यरत होतानाच पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध झाल्यास उचल चांगली होते.

९) रासायनिक खतांचा वापर माती परीक्षण करून समतोल प्रमाणात करणे हिताचे ठरते. अनेकवेळा मातीत मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध असतात, तरी आपण अजाणतेपणाने खतांचा पुरवठा करत असतो. याचा परिणाम अन्नद्रव्यांची उचल होण्यावर होत असतो.

१०) मातीत सूक्ष्मजीव मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याच्या विघटन आणि उपलब्धतेमध्ये मोलाची भूमिका निभावतात. अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्याची नितांत गरज असते. त्यासाठी सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट शेणखत वापरावे.

११) पावसाळ्यात पिकांना जिवामृत देणे हिताचे ठरते. आपण जेवण केल्यावर ते पचवण्याचे काम लाळग्रंथी व पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव करत असतात. त्याच प्रमाणे शेतातील रासायनिक खते पचवण्याचे काम अल्प कालावधीमध्ये विघटन करण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. त्यांचे प्रमाण जीवामृतामध्ये अधिक असते. परिणामी खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.

१२) बऱ्याच वेळा पावसाळ्यात रासायनिक घटकांच्या फवारण्या घेणे शक्य होत नाही. अशा वेळी जैवक घटकांची फवारणी उपयोगी ठरते. उदा ः ट्रायकोडर्मा

दत्तात्रय ढिकले, ९९२२३८१४३६

(प्रगतीशील शेतकरी व अध्यक्ष, ॲग्री ऑर्गेनिक रिसर्च फौंडेशन,

पिंपरी सय्यद, ता. जि. नाशिक.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT