soil water conservation in field 
 सध्या तूर वाढीच्या टप्यात असून आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे.तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.       तूर पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५     दिवसांचे असताना  दुसरी कोळपणी करावी.कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यायोगे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा  अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.कोळपणी शक्यतो, वाफशावर करावी. तूर  पीक पहिले ३० ते ४५  दिवस तणविरहित ठेवावे.गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.
 - डॉ. आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९,    (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी,जि.नगर)