use recommended varieties of millet for sowing 
ॲग्रो गाईड

बाजरी लागवडीचे तंत्र

बाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. थंडी कमी झाल्यावर पेरणी करणे फायदेशीर ठरते. १५ फेब्रुवारीनंतर पेरणी केल्यास, उष्ण तापमानामुळे कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. पेरणी ३० सेंमी पाभरीने करावी. दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

डॉ. एस. एस. विटनोर, व्ही. एम. भराडे

बाजरीची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. थंडी कमी झाल्यावर पेरणी करणे फायदेशीर ठरते. १५ फेब्रुवारीनंतर पेरणी केल्यास, उष्ण तापमानामुळे कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. पेरणी ३० सेंमी पाभरीने करावी. दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. उन्हाळी हंगामात चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बाजरी पीक महत्त्वाचे ठरते. उन्हाळ्यातील तापमान आणि हवामान पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. या हंगामात पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते.पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. पिकाच्या वाढीसाठी १० ते ४५ अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते.सुरवातीच्या अवस्थेत उगवण, फुटवे येण्याच्या काळात तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळूहळू होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त कालावधी लागतो. लोखंडी नांगराने १५ सेंमी खोल जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेतातील पीक अवशेष गोळा करून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणीच्या आधी हेक्टरी १२ ते १५ बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरावे.  जाती  संकरित जाती श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती सुधारित जाती आयसीटीपी    ८२०३, धनशक्ती, परभणी संपदा  (पी.पी.सी. ६)  बीजप्रक्रिया २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया हे द्रावण तयार करण्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला राहिलेले निरोगी आणि बियाणे वेगळे करावे. ते स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून नंतर सावलीत वाळवावे.

जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया ॲझोस्पिरिलम व पीएसबी १० ते १५ ग्रॅम  प्रति किलो  बियाणास प्रक्रिया करावी. यामुळे नत्र खतामध्ये २० ते २५ टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते. लागवडीची पद्धत

  • पेरणीसाठी हेक्टरी साडेतीन ते ४ किलो बियाणे लागते.पेरणी ३० सेंमीच्या पाभरीने करावी. दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. थंडी कमी झाल्यावर पेरणी करणे फायदेशीर ठरते. १५ फेब्रुवारीनंतर पेरणी केल्यास उष्ण तापमानामुळे कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. 
  • रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली आणि २० ते २५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी.
  • सुरवातीच्या १ ते दीड महिन्याच्या काळात १ खुरपणी व २ कोळपण्या कराव्‍यात. पीक तणविरहित ठेवावे. 
  • हेक्‍टरी ४५ किलो नत्र, ४५ किलो स्फुरद, ४५  किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्‍टरी ४५ किलो नत्र द्यावे.
  • बाजरी पिकाला एकूण ३५ ते ४० सेंमी पाण्याची गरज असते. पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी कमी पडू देऊ नये. 
  • -  डॉ. एस. एस. विटनोर,  ९५२७६७५१०३ (कृषी वनस्पती शास्त्र विभाग,छत्रपती शाहू महाराज, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, जि. औरंगाबाद)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

    Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

    Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

    Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

    Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

    SCROLL FOR NEXT