Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट; माॅन्सूनची वाटचाल गेल्या तीन दिवसांपासून थांबली

Weather Update : पुढील ४ दिवसांमध्ये राज्यात बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Pune News : माॅन्सूनची वाटचाल गेले तीन दिवस थबकलेली आहे. तर राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी झालेला दिसतो. तरीही पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे. तसेच पुढील ४ दिवसांमध्ये राज्यात बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने बुधवारनंतर राज्यात मुक्काम केला आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. विदर्भातील पूर्व भाग आणि खानदेशातील नंदूरबार जिल्हा व्यापायचा बाकी आहे. तेलंगणाचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात माॅन्सून पोचलेला आहे. माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती.

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मंगळवारी आणि बुधवारी विदर्भात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT