Gramin Sahitya Agrowon
ॲग्रो विशेष

Gramin Sahitya : ग्रामीण साहित्यात शेतकऱ्यांचं प्रतिबिंब आहे का?

मृदगंध म्हणजे मातीचा गंध. पहिला पाऊस पडल्यावर जो गंध येतो त्याला मृदगंध म्हटले जाते. याचा अर्थ एवढाच आहे की आपण साहित्यातील केवळ ग्रामीण जीवन रेखाटणाऱ्या कलाकृतींचा विचार करणार आहोत.

अमर हबीब

आपण ग्रामीण साहित्य संमेलन (Gramina Sahitya Sammelan) घेत आहोत, म्हणजे काय? ज्या साहित्यात ग्रामीण जीवन व्यक्त होते, त्या साहित्याचा आपण अधिक विचार करणार आहोत.

आपण शेती (Agriculture) आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेले साहित्य आपल्या अजेंड्यावर घेतले आहे. आपण आपल्या साहित्य संमेलनाचे नाव ‘मृदगंध’ (Mrudgandh) ठेवले आहे.

मृदगंध म्हणजे मातीचा गंध. पहिला पाऊस पडल्यावर जो गंध येतो त्याला मृदगंध म्हटले जाते. याचा अर्थ एवढाच आहे की आपण साहित्यातील केवळ ग्रामीण जीवन रेखाटणाऱ्या कलाकृतींचा विचार करणार आहोत.

पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आम्ही जरी ग्रामीण साहित्याचा या संमेलनाच्या निमित्ताने विचार करीत असलो तरी आम्ही साहित्यात भेदाभेद - श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही मानीत नाहीत.

मुळात साहित्याचा उगम हाच ग्रामीण जीवनाशी निगडित होता. क्रौंच पक्ष्याची एका राजाने हत्या केली, तेव्हा त्या पक्ष्याने जो टाहो फोडला तो साहित्याचा पहिला उद्गार मानला जातो.

ही घटना कोण्या फाइव्ह स्टार हॉटेलात घडली नसावी, हे उघड आहे. ती कोठेतरी जंगलात घडली असावी. तेव्हा ग्रामीण जीवन वगळून साहित्याचा विचार होऊ शकत नाही.

ग्रामीण जीवनावर सातत्याने लिहिले गेले. कथा-कादंबरीत, कवितेत ग्रामीण भागाचे, निसर्गाचे चित्रण झालेच आहे. संस्कृत असो की पाली, देशी भाषा असो की विदेशी- कोणत्याही भाषेतील साहित्याचा परिवेश ग्रामीण आहे. त्याचे कारण उघड आहे.

त्या काळात औद्योगिकीकरण झाले नव्हते. जे होते ते सगळे ग्रामीण होते. त्यामुळे ग्रामीण संदर्भ नाही अशी भाषा नाही. जशी भाषा असते तसे साहित्य निर्माण होते.

सर्व भाषांतील सनातन साहित्यात निसर्ग रेखाटला गेला आहे. औद्योगिकीकरणानंतर मात्र तफावत पडू लागली. कारखाने उभे राहिले. त्यांभोवती मजूर राहू लागले.

या मजुरांना लागणाऱ्या वस्तू पुरवणारे लोक आले. शहरे वाढू लागली. हे जीवन ग्रामीण जीवनापेक्षा वेगळे होते. काय होते वेगळेपण? येथे शेती आणि शेतकरी नव्हते.

वेगवेगळ्या भागांतून आलेले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक वस्ती करून राहू लागले.

लोकांनी स्थलांतर केले. गाव सोडले पण त्यांची गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती. कच्चा माल असो की खाण्यासाठी लागणारे अन्न, ते मात्र त्याच शेतकऱ्यांकडून यायचे.

ते स्वस्त मिळाले तर त्यांना हवेच होते. सरकार मध्ये पडले. त्यांनी स्वस्तात माल पुरविण्याची व्यवस्था केली. तसे कायदे केले.

कारखानदारांनाही हे हवेच होते. कारण अन्नधान्याच्या किमती कमी राहिल्या तर त्यांना मजूर स्वस्त मिळतो. नुसत्या अन्नधान्याच्या किमती कमी ठेवल्या तर शेतकरी अन्नधान्य पिकवायचे बंद करतील.

मग काय? सगळ्याच शेतमालाच्या किमती कमी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. कच्चा माल व कामगार स्वस्तात मिळू लागला म्हणून कारखानदार आनंदी झाला.

कामगारांनादेखील स्वस्त अन्नाचा आनंदच व्हायचा. त्यामुळे शेती आणि शहरे यांत जो सुसंवाद असायला हवा होता तो तुटला. अशा शहरात जन्मलेल्या लेखकांनी झुळझुळ वाहणारे निर्झर, शुद्ध हवेचा झोका, हिरवी शालू नेसलेली शेती, निसर्गाचे सौंदर्य असे गावांचे वर्णन केले.

औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात शहरी लेखकांनी शेतीचे लोभसवाणे चित्र रंगविले. हे लेखक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते.

त्यांनी शेतकरी अडाणी, वेडा, विदूषक दाखविला. ‘गावंढळ’ हा शब्द तेव्हाच निर्माण झाला. शेतीतील हालअपेष्टांचे वर्णन मात्र त्यांनी केले नाही.

कामगार चळवळींचा जोर वाढल्यानंतर डाव्यांच्या साहित्याला रंग चढला. त्यांनी शेतकरी खलनायक म्हणून प्रस्तुत केला. हे सगळे साहित्य बिगर शेतकऱ्यांचे आहे.

आजही जे ग्रामीण म्हणून साहित्य ओळखले जाते ते बहुतेक प्राध्यापकांनी लिहिलेले आहे. दलितांचे साहित्य दलित लिहितात, आदिवासी साहित्य आदिवासी लिहितात.

शेतकऱ्यांचे साहित्य मात्र दुसरेच लिहितात, असे का? शेतकऱ्यांचे साहित्य शेतकरी का लिहीत नाहीत, हे आपण समजावून घेतले तर शेतकरी म्हणा की ग्रामीण साहित्याचा उलगडा होईल.

(बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे संपादित अध्यक्षीय भाषण.)

सौजन्यः साप्ताहिक साधना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT