Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis: पाणी टंचाईची समस्या सुटणार कधी?

Water Scarcity: जागतिक जलदिन साजरा करताना सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो, पण कोरडवाहू भागात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी झुंज सुरू आहे. हे फक्त टंचाईचं नाही, तर सामाजिक आणि आरोग्याच्या संकटाचंही दर्शन घडवतं आहे.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Thirstsy Rural India: सकाळी बोअरवेलचे पाणी बैलगाडीमधील टाकीत भरताना काढलेले फोटो काढला. तेही ७०० फूट खोल भूगर्भातील आहे. हे पाणी भरपूर क्षारयुक्त आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे वेगळेच.

दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जागतिक जलदिन सगळीकडे शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. शुभेच्छासाठी हे ठीक आहे. मात्र पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेतलेला दिसून येतं नाही. कोरडवाहू परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याची स्थिती काय आहे हा प्रत्यक्ष अनुभवत आहे. पाणीप्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे जागतिक पाणी दिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ हे समजलं नाही. कारण स्वातंत्र्य मिळूनही ७८ वर्ष झाली, तरीही पिण्याचे पाणी मिळत नाही. शुद्ध पाणी मिळणे दूरच आहे.

ग्रामीण भागात जवळजवळ ६० पेक्षा जास्त कुटुंबाला स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी भूगर्भातील पाणी पिण्यासाठी मिळवावे लागते. तर शहराच्या परिघावरील कुटुंबाला विकत घ्यावे लागते. तेही शुद्ध असेल याची खात्री नाही.

"ज्याचं जळतं, त्यालाच कळतं " अशी ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे आहे. शहरातील आणि पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, तेच पाणी दिनाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. मात्र दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातील नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी काय त्रास होत असेल, याची मूल्यमापन शब्दांमध्ये करता येत नाही. एकूणच जवळजवळ ८० टक्के नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळत नाही. जसे पाणी असेल तसे थेट पोटात ढकलत रहावे लागते. या ८० टक्यांमध्ये जवळजवळ ७० टक्के नागरिक ग्रामीण भागातील आहेत.

जल जीवन मिशनच्या माध्यमातून कागदोपत्री नळ पुरवठा केला आहे, अशा नोंदी आहेत. पण प्रत्यक्ष नळ पुरवठा हा ४० टक्के कुटुंबांना देखील झालेला नाही, हे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकार म्हणत असेल की आम्ही पाणी पुरवठा जल जीवन मिशनच्या माध्यमातून करत आहोत. तरी ही चित्र फारसे वास्तविक नाही. स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणे हा प्रकार आहे.

पाणी हे जीवनातील मूलभूत घटक असला तरीही हळूहळू निर्विष्ठांच्या यादीत केव्हा जाऊन बसला हे जनतेला देखील कळले नाही. कारण पाणी एक तर विकत घ्यावे लागते. ते कोठेही फ्री मध्ये मिळत नाही. जर सार्वजनिक पुरवठ्यातून मिळाले तरीही त्याची किंमत आरोग्याच्या रूपाने मोजावी लागते. कारण पाणी पुरवठा करणारे साधने कधीच शुद्ध पाणी देत नाहीत. तलाव, विहीर, बोअरवेल अशा ज्या ठिकाणाहून पाणी आणले जाते, तेथून थेट पाणी पुरवठा केला जातो. त्याचे शुद्धीकरण केले जात नाही.

पाण्याचा रंग हिरवा असतोच. शिवाय पाण्याचा वास देखील येत राहतो. असे पाणी टँकर किंवा इतर साधनाच्या माध्यमातून अपवाद वगळता सर्वत्र पुरवले जाते. परिणामी आरोग्याच्या रूपाने खूप मोठी किंमत मोजावी लागते. फिल्टरचे असो, किंवा नळ योजनेचे असो विकत घ्यावे लागत असल्याने ते निर्विष्ठांच्या यादीत येते. अर्थात जसे जसे पाणी निर्विष्ठांच्या यादीत जाऊ लागले तसे तसे पाण्याची किंमत देखील वाढीव स्वरूपात मोजावी लागत आहे.

पाणी मिळवणे आणि वापरणे हा माणसाचा मूलभूत नैसर्गिक हक्क. पण तोच हक्क हळूहळू नाकारला जाऊ लागला आहे. तर शेतीचे पाणी ही तर नवीन भानगड आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढण्याऐवजी कमी होणे चालू आहे. निसर्गाने पाणी जरी दिले आले तरीही ते खासगी मालकीकडे झुकू लागले आहे.

ग्रामीण भागातील जवळपास ७० टक्के नागरिकांच्या घसा कोरडा पडायला आहे. त्यांना पाणी देण्यास सामाजिक आणि राजकीय व्यवस्था अपयशी ठरलेली आहे. मात्र पाणी ज्यांच्याकडे उपलब्ध आहे, त्यांना विविध मार्गाने बंधने आणली जात आहेत. पाण्यासाठी समान हक्क किंवा अधिकार नाकारले जात आहेत. एकूणच पाण्याचा खासगी वस्तू म्हणून वापर करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT