Banana Farmers Facing Sapling Shortage: युद्धाच्या झळा टिश्युकल्चर व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे. युद्धामुळे सर्व पेट्रोलियम आणि केमिकल उत्पादनांचे दर वाढण्यास मार्चपासून सुरुवात झाली आहे. टिश्युकल्चरला केमिकल पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनी युद्ध चालू झाल्यापासून केमिकलच्या दरात ३० ते ३०० टक्के दरवाढ केलेली आहे. त्यामुळे रोपे निर्मितीचा खर्च प्रचंड वाढला आहे. पॉलिमरच्या किमती वाढल्याने टिश्युकल्चरला लागणारी बॉटल कॅप्स, टिश्युकल्चर ट्रे, नर्सरी ट्रे, नर्सरी पिशव्यांचे दर दुपटीने वाढले आहेत..व्यावसायिक गॅसटंचाई निर्माण झाल्याने काचेच्या बाटल्यांच्या कंपन्या बंद आहेत, त्यामुळे लॅबसाठी लागणाऱ्या काचेच्या बाटल्यांची टंचाई निर्माण झाली आहे. जादा पैसे देऊनही या बाटल्या मिळत नाहीत. सोबत युरोपातून पीटमॉस घेऊन येणारे कंटेनरदेखील वाटेत अडकले आहेत. आणि नवीन कंटेनर आणण्यास जहाज कंपन्या नकार देत आहेत. त्यामुळे नवजात लॅबमधून बाहेर पडलेली रोपे लावायची कशामध्ये हा प्रश्न टिश्युकल्चर कंपन्यांना पडला आहे..Khandesh Banana Price: खानदेशात केळीचे दर स्थिर; कमाल भाव २४०० रुपयांपर्यंत.देशात तयार होणारे कोकोपीट युद्ध सुरू होण्याअगोदरच वाढले आहे. टिश्युकल्चरमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या आयसो प्रोफील अल्कोहोलचे दर युद्धापूर्वी २० ते २२ हजार रुपये प्रति बॅरल वरून आता ५० हजार रुपये प्रति बॅरेलपर्यंत झालेले आहेत. टिश्युकल्चर रोपे तयार होण्याची प्रक्रिया ही एकूण दहा महिन्यांची असल्याने या सर्व घटकांचा याच्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिणामी केळी रोपांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे..सोबतच टिश्युकल्चर डाळिंब, बांबू याची पण तीच अवस्था आहे. असोसिएशन ऑफ टिश्युकल्चर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अक्षय पाटील म्हणाले, की या युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास केला असता असे दिसून येते की युद्ध जरी थांबले, तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्यासाठी आणि लागणाऱ्या वस्तूंच्या किमती आवाक्यात येण्यासाठी अजून वर्षभराचा काळ जावा लागेल. त्यामुळे उत्पादन क्षमता जरी कंपनीची मोठी असली तरी या कच्चा मालाअभावी कंपनी निम्म्या उत्पादन क्षमतेवर चालवावी लागत असल्याने जून-जुलैच्या हंगामात रोपांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे..Banana Cultivation: करमाळ्यात केळी लागवड ३२०४ हेक्टरने घटली.कच्चा माल कमतरतेमुळे उत्पादनक्षमतेत घट‘‘केळीचे दर वाढत असल्याने नैसर्गिक मागणी पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे. रोपांची संख्या प्रयोगशाळेतून किती बाहेर पडणार याचा आकडा निश्चित असल्याने ऐनवेळी रोपे जास्त देता येणार नाही. त्यात युद्धामुळे टिश्युकल्चरला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे उत्पादनक्षमता २५ टक्के कमी आणलेली आहे. ही पुरवठा साखळी अशीच विस्कळीत राहिली, तर पुढील आठ महिने अपेक्षित रोपे बाहेर देता येणार नाहीत. शिवाय कच्चा माल महाग झाल्याने रोपांच्या किमती किमान २४ ते २६ रुपयांपर्यंत जाऊ शकतात,’’ असे टिश्युकल्चर उद्योजक विश्वास चव्हाण यांनी सांगितले..रोप निर्मितीचे काम आव्हानात्मकमहाराष्ट्रात ४८ पैकी २० कंपन्या फक्त केळी रोपांची निर्मिती करत असल्याने पुरवठा कसाबसा होत आहे. या काळात रोप निर्मितीचे काम आव्हानात्मक असल्याचे या उद्योगातून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.