Weather Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : ईशान्य हिवाळी पाऊस देशातून कधी जाणार? 

Weather Forecast : मान्सून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातही थंडी वाढते. ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून, विषववृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी 'पुरवी' वारा झोताचा प्रभावही त्यामुळे कमी होईल.

Team Agrowon

Weather Forecast : दक्षिण भारतातील केरळ तामिनाडू आंध्र, कर्नाटक  तसेच पोंडिचेरी काराईकल मधील गेले ३ महिन्यापासून असलेला ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांती दरम्यान ओसरून, तेथील हिवाळी पावसाचा हंगाम ह्या वर्षी १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

तसा हा मान्सून डिसेंबरमधेच निघून जावयास हवा. पण ह्या वर्षी उशीर होत आहे. तेथील मान्सून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातही थंडी वाढते.  ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून,  विषववृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी 'पुरवी' वारा झोताचा प्रभावही त्यामुळे कमी होईल.

आणि विषववृत्त दरम्यानचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाब असलेले 'आंतर-कटिबंधीय अभिसरणीय परीक्षेत्र ' (इंटर ट्रॉपिकल कॉनवर्जिंग झोन) विषववृत्तवरील (शून्य डिग्री अक्षवृत्त) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे १० डिग्री दक्षिण अक्षवृत्त (दक्षिण गोलार्धात)पर्यन्त सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रतही हवेच्या उच्चं दाब पोळ(' रिज ')ही दक्षिणेकडे सरकेल, अशी माहिती खुळे यांनी दिली.

सरकलेल्या 'पोळ'मुळे उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना ' पोळ (रिज) ' चा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींसी थंडी  वाढेल. येथे काहीशीच थंडीचा उल्लेख केला, कारण चालु ' एल-निनो' च्या प्रभावामुळे एकापाठोपाठ पास होणारे झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे.

त्यांच्या कमकुवतपणामुळे काश्मीरचा सध्याचा चालु '४० दिवसा (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी)चा ' चालाई कलान'च्या उच्चं थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीही बर्फबारी विना कोरडा जात आहे. एकूणच उत्तर भारतातही थंडीची तीव्रता कमी आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला आहे. 

डिसेंबर २२ तारखेला पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे मकर वृत्तचा भाग जास्तीत जास्त सूर्यासमोर असतो आणि त्याच्या संक्रमण कालावधीत हा १४/१५ जानेवारी पर्यन्त मकर वृत्तावरच जाणवतो. आणि त्या दिवसा नंतर म्हणजे मकर संक्रांतीपासून पृथ्वीचा उत्तरेकडील भाग सूर्यासमोर येणे( उत्तरायण)वाढत चालते.

थंडी संक्रांतीदरम्यान जाणवणार असली तरी सध्या १२ ते १४ जानेवारी पर्यन्तच्या ३ दिवसात  महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १८ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक)  तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असु शकते, असेही खुळे यांचा अंदाज आहे.

रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत असतात. म्हणून तर ह्या कालावधीत पीकमुळे वाढीसाठी मोकळी हवा व पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. म्हणून थंडीचा हा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो.  

पंजाब, हरियाणा, राजस्थान राज्याच्या  काही भागात सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अति नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे. म्हणूनच  महाराष्ट्रातील खान्देशात सकाळच्या वेळी  सध्या धुके जाणवत आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT