Maharashtra Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought Condition : दुष्काळाची दाहकता! महाराष्ट्रातील ४२२ गावांमध्ये ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा

sandeep Shirguppe

Drought Condition Maharashtra : कोकण आणि विदर्भवगळता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात टँकर सुरू झाले आहेत. राज्यात जवळपास ४२२ गावांमध्ये ४५० टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये दर आठवड्याला टँकरच्या संख्येत वाढ होत असून, यापुढच्या काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांचा पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये केवळ ३६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात मागच्या वर्षी डिसेंबर अखेरीस एकही पाण्याचा टँकर सुरू नव्हता. शिवाय पाण्याचा साठाही ८३ टक्क्यांच्या पर्यंत होता. यंदा मात्र पाणीटंचाईचे संकट असल्याचे दिसत आहे.

धरणांतील पाणीसाठा खालावतोय

राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या लहानमोठ्या सर्व २ हजार १९४ धरणांमध्ये ६२.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात ३६,४९ टक्के, पुणे विभागातील धरणांमध्ये ६५.९१ टक्के, नाशिक विभागातील धरणांत ६६.५२ टक्के तर नागपूर विभागातील धरणांत ६८.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

उजनीत उपयुक्त पाणीसाठा १७ टक्क्यांपर्यंत

गेल्या तीन महिन्यांत पाण्याचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सध्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा १७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर ९.४८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात इंदापूर, सोलापूर भागांतील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न उभा राहणार असल्याचे चित्र आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील धरणांत २२.१९ टीएमसी म्हणजेच ७६ टक्के पाणीसाठा आहे. तर नीरा खोऱ्यातील धरणांत ३४.६० टीएमसी म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांत २८.६२ टीएमसी म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT