Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : खानदेशात जलसाठा २२ टक्क्यांवर

Water Storage : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा किंचित वाढला असून, हा साठा सुमारे २२ टक्के एवढाच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा किंचित वाढला असून, हा साठा सुमारे २२ टक्के एवढाच आहे. गिरणा धरणातील साठा १२ टक्के एवढाच आहे. जलसाठा फारसा वाढलेला नसल्याने पुढे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यास अधिक आहे.

जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडले जाते. तसेच रब्बीत २१ हजार हेक्टरला लाभ मिळतो. या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले आहे. तर रब्बीसाठीदेखील तीनदा आवर्तन सुटले होते.

धरणाची साठवण क्षमता १८ टक्के एवढी आहे. हे धरण गेले दोन वर्षे १०० टक्के भरले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे. पण सद्यः स्थितीत धरणात फक्त १२ टक्के जलसाठा आहे. त्यातून डिसेंबर ते जून या कालावधीत टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले होते. यामुळे जलसाठा सतत घटला आहे.

तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) धरणातील जलसाठा यंदाही १०० टक्के राहील. त्यातून सध्या जलसाठा नियंत्रणासाठी नदीत पाणी सोडले जात आहे. तापी नदी प्रवाही आहे. पण या धरणात ५५ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटतो. हतनूरमधून तीनदा रब्बीसाठी आवर्तन सुटले आहे.

तसेच दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते. जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे.

यातही सुमारे ४५ टक्के जलसाठा आहे. या धरणातून जामनेर शहर, जळगाव शहर व औद्योगिक वापरासाठीदेखील पाणी दिले जात आहे. यामुळे धरणातील साठाही घटला आहे. गिरणा व अन्य मध्यम, मोठे प्रकल्प भरलेले नसल्याने जलसाठा खानदेशात फारसा वाढलेला नाही. एकूण जलसाठा २० टक्क्यांखाली आला होता. त्यात किंचित वाढ झाली आहे.

काही प्रकल्प भरले

जळगाव जिल्ह्यातील बहुळा, अंजनी, मन्याड, तोंडापूर, अग्नावती, बोरी, भोकरबारी हे प्रकल्प रिकामेच आहेत. रावेरातील अभोरा, मंगरूळ या प्रकल्पांची जलपातळी वाढली आहे. रावेरातील सुकी, यावलमधील मोर, हरिपुरा, वड्री हे प्रकल्प भरले आहेत. चोपड्यातील गूळ या धरणातील साठाही ५२ टक्क्यांखाली आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा या प्रकल्पांची जलपातळी वाढली आहे. नंदुरबारमधील शहादा व दरा या प्रकल्पांची जलपातळीदेखील वाढली आहे. धुळ्यातील अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पातील साठाही ३५ टक्के एवढाच असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election : राज्यात पाच वर्षात १०० टक्के शेत रस्ते पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती

Rural Motivational Story: अंदळदेवचे ‘लक्ष्मीदार’ सोमा आणि सखू!

Rain Update : नगरमध्ये मुर पाऊस, पिकांना दिलासा

Soybean Crop Disease: सोयाबीन पिकावरील खोडमाशी व्यवस्थापन

Plant Nursery Business: रोपवाटिका व्यवसायाची उलाढाल पोहोचली अडीच कोटींवर!

SCROLL FOR NEXT