Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : राज्यात ग्रामीण भागाच्या घशाला कोरड

Water Scarcity : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे, तशी राज्यात पाणीटंचाई भीषण रूप धारण करू लागली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे, तशी राज्यात पाणीटंचाई भीषण रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे नागरिक पाणी-पाणी करीत आहेत.

धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी झाली आहे. सध्या २६ हून अधिक धरणांनी तळ गाठला आहे. त्यातही मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांत पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांची विशेषताः महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू असून, शेतकऱ्यांना जनावरे जगविणे मुश्कील झाले आहे.

यंदा पहिल्यांदाच जानेवारीतच धरणांतील पाणीपातळी कमी झाली आहे. यामध्ये शून्य टक्क्याहून कमी झालेल्या धरणांची संख्या २६ आहे, तर एक ते १० टक्के पाणीसाठ्याच्या धरणांची संख्या २४ एवढी आहे. उन्हाचा चटका आणखी वाढल्यास येत्या काळात उर्वरित धरणेही कोरडी पडण्याची दाट शक्यता आहे.

दोन हजार प्रकल्पांत ३६ टक्केच पाणीसाठा

राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी ५२४.७० टीएमसी (१४८६२.१३ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी याच काळात ४६.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. मागील काही वर्षांतील विचार करता हा एप्रिलमधील अत्यंत कमी पाणीसाठा आहे.

मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

सध्या मराठवाड्यातील धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण ९२० धरणांत अवघा ४८.४५ टीएमसी म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच धरणांत ४५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठी घट झाली असून माजलगाव, रोशनपुरी, सिरसमार्ग, वांगदरी, ढालेगाव, हिरडपुरी, मंगरूळ, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना अशी अनेक धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही धरणे आधीच कोरडी पडली आहेत.

नागपूर विभागातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणी आहे. एकूण ३८३ धरणांत ७८.४५ टीएमसी म्हणजेच ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी २७ टक्के पाणी होते. अमरावती विभागातील २६१ धरणांत ६४.७९ टीएमसी म्हणजेच ४८ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी ४७ टक्के पाणी होते.

नाशिक विभागातील ५३७ धरणांत ७८.६६ टीएमसी म्हणजेच ३७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ५३ टक्के होता. पुणे विभागातील ७२० धरणांत १८९.४३ टीएमसी म्हणजेच ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी तो ४८ टक्के होता. कोकण विभागातील १७३ धरणांत ६४.९१ टीएमसी म्हणजेच ४९ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी तो ५६ टक्के होता.

मोठ्या प्रकल्पांत ३६ टक्के पाणीसाठा

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ३७१.१६ टीएमसी म्हणजेच सरासरी ३६.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ४५.६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास ९.४४ टक्केने कमी पाणीसाठा झाला आहे.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ (टीएमसीमध्ये)

धरण---एकूण क्षमता---पाणीसाठा---यंदा (टक्के)---गेल्या वर्षी (टक्के)

उजनी---११७.२१---उणे १९.७७---उणे ३६.९१---२६

कोयना---१०५.२४---४६.५२---४६---४९

जायकवाडी---१०२.६७---१५.२५---१९---५२

मांजरा---६.२५---०.४४---७ ---५९

निम्न दुधना---८.५४---०.६१---७---५४

बेंबळा---६.४९---२.४२--- ३७---४२

मुळा---२१.५०---७.७३---३५---५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT