Solapur News : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून दौंडकडून धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे.
त्यामुळे चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली. परिणामी पंढरपूर शहरातील संभाव्य पुराचा धोका टळला आहे. चंद्रभागा नदीमध्ये बुधवारी सकाळी नऊ वाजता ८१ हजार ९०४ क्युसेकने पाणी वाहत होते.
ते सायंकाळी पाच वाजता ७२ हजार ४८५ क्युसेक झाले होते. त्यामुळे सायंकाळी चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी झाली, त्यामुळे पंढरपूर शहराला असणारा पुराचा संभाव्य धोका तूर्त टळला आहे.
त्यानंतर गुरुवारी (ता.३१) सकाळी सहा वाजता पुन्हा उजनी धरणातून भीमेत सोडण्यात येणारा विसर्ग ३० हजार क्युसेकने कमी करण्यात आला. सातत्याने कमी होणाऱ्या या विसर्गामुळे चंद्रभागा नदीची पाणीपातळी अजून घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कालव्यासह बोगद्याला पाणी
उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या पातळीत घट झाली असली, तरी गुरुवारी (ता.३१) धरणाची पाणी पातळी ४९६.७०० मीटरवर राहिली. धरणातील एकूण पाणीसाठा ११५.७० टीएमसी, तर त्यापैकी उपयुक्त साठा ५२.४ टीएमसी आणि या पाण्याची टक्केवारी ९७.१३ टक्क्यांवर पोचली आहे. सध्या धरणातून मुख्य कालव्याला ११०० क्युसेक, सीना-माढा योजनेला १८० क्युसेक, दहिगाव योजनेला ८० क्युसेक, तर बोगद्याला ४०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.