
Solapur News : उजनी धरण सध्या ९५.६१ टक्के भरले आहे. दौंडवरून धरणात सहा हजार ६०० क्युसेकची आवक असल्याने शुक्रवारी (ता. २५) धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
त्याचबरोबर धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील १६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. जून-जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने उजनी धरणात दौंडवरून येणारा विसर्ग बंद झाला होता. मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने दौंडवरून उजनी धरणात विसर्ग जमा होत आहे.
त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत पूर नियंत्रणासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पाच हजार क्युसेकचा विसर्ग सोडला आहे.
आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाणार आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, नदी पात्राजवळील साहित्य किंवा जनावरे तत्काळ हलवावेत’ असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी केले आहे.
धरणातून सोडलेले पाणी
पॉवर हाऊस : १६०० क्युसेक
भीमा नदी : ५००० क्युसेक
बोगद्यातून : ४०० क्युसेक
उपसा सिंचन योजनेसाठी : २६० क्युसेक
कालव्यातून : १४०० क्युसेक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.