Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : 'नुकसान भरपाई द्यायला नको अन् म्हणे ४०० पार'; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Uddhav Thackeray On BJP : गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकरी त्रस्त झाला आहे. यातून सरकार त्यांना आधार देत नाही. त्यांना भरपाई देखील देत नाही, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील लोकसभांच्या ४८ जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून सर्वच पक्ष आता कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बुधवार (ता.२० रोजी) उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यावर असताना, शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योग, नुकसान भरपाई यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, भाजप आणि राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही, अशी टीका केली आहे.

राज्यात गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचदरम्यान गेल्या तीन दिवसापासून विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरसह बुलढाणा आणि वाशिममध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र आता अचारसंहीता लागल्याने पचनामे होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी, भाजपसह राज्यातील शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील शिंदे सरकारसह केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही. पिक विम्याचे पैसे देत नाही. त्यातच गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भात शेतकरी त्रस्त झाला आहे. यातून सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार न देता ४०० पार चा नारा देत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नसल्याचेही ठाकरे म्हणाले.

तसेच केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे सरकार शेतीला भाव देत नाही, ना त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नाही शिकलेल्या मुलांना नोकऱ्या. असे असताना महायुतीचा नारा ४०० पार चा आहे. कशाला हवेत ४०० पार? पण आता नाही बस, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच आता ४०० पार चा नारा नाही. तर थेट तडीपार. जसे याआधी '५० खोके एकदम ओके' चा नारा राज्यभर घुमवला तसाच 'अबकी बार भाजप तडीपार'चा नारा राज्यभर घुमवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

राज्यातील बाहेर जाणाऱ्या उद्योगावरून ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला. ठाकरे म्हणाले, गुजरातला त्याच्या न्याय हक्काचे आहे ते द्या. तेथे न्या. पण महाराष्ट्रातून ओरबाडून नको. गेल्या १० वर्षात भाजपने भांडणे लावण्याचे काम केले. आताही जाती-पातीत, धर्मा-धर्मात भाडणे लावण्याचे काम भाजप करत असल्याचे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

तर माझ्यावर, शिवसेना सोडली, हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, असा आरोप केला जातोय. तर का फक्त या राज्यातील मुस्लिम माझ्याबरोबर आला म्हणून. पण कोणी एखादा एका धर्माचा आहे म्हणून त्याला मारा असं बाळासाहेबांनी नाही शिकवलं. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाचे आहे. तर २ पक्षांना फोडून तुम्हाला पुन्हा यावं लागतं, याची लाज वाटली पाहीजे असा ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT