Jal Jeevan Mission Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : जलजीवनच्या ४७१ योजनांचे हस्‍तांतर रखडले

Jal Jeevan Scheme : जलजीवनची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून जिल्हा परिषदेने बिले दिलेली नाहीत. त्यामुळे त्‍यांची आर्थिक कुचंबणा होत असून त्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा

Alibag News : अलिबाग,: जलजीवनची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून जिल्हा परिषदेने बिले दिलेली नाहीत. त्यामुळे त्‍यांची आर्थिक कुचंबणा होत असून त्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सर्व कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची भेट घेत निवेदन दिले.

जिल्हा परिषदेच्या कुंठे बाग येथील इमारतीमध्ये सर्व कंत्राटदार जमा झाले होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची भेट घेत स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय झाल्यास यापुढे जिल्हा परिषदेच्या कामांवर बहिष्कार टाकला जाईल, असे त्‍यांनी सांगितले. निवेदनात जिल्ह्याबाहेरील कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असून अशाच कंत्राटदारांची बिले प्राधान्याने काढली जातात. बाहेरच्या कंत्राटदारांमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्‍याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात जलजीवनच्या सर्व योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करायच्या होत्या; मात्र यातच लाडकी बहीण योजनेने सरकारी तिजोरी रिकामी केल्याने जलजीवनच्या १,४२२ पैकी ७३१ योजनांची कामे पूर्ण होऊनही यातील ४७१ योजनांची देयके देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत.

कंत्राटदारांच्या सततच्या तगाद्यानंतर जिल्हा परिषदेने ८० कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील फक्त १४ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे आले आहेत, यातून ४७१ योजनांची देयके काढायची आहेत.

जिल्ह्याबाहेरील कंत्राटदार राजकीय दबावतंत्राचा वापर करून देयके काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी बीड जिल्ह्यातील कंत्राटदाराच्या बिलाचे पैसे मिळाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदार संतप्त व्यक्‍त करीत असून देयकांची मागणी करीत आहेत.

निधीच उपलब्‍ध होत नसल्‍याने कंत्राटदार सतत तगादा लावत आहे. आता जे पैसे आले आहेत ते वाटण्याची कसरत करावी लागणार आहे. ज्या योजना हस्तांतरित झाल्या नाहीत त्या सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदारांनाच वीजबिल, डागडुजी, देखभाल करणाऱ्या कामगाराचा खर्च द्यावा लागत आहे. सातत्याने हे कंत्राटदार देयके मंजूर करण्यासाठी तगादा लावत आहेत; परंतु पैसेच नसल्याने त्यांना कामाचे पैसे देता येत नाहीत. सध्या ८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT