Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : नगर जिल्ह्यात तीन कृषी निविष्ठा परवाने कायमस्वरूपी रद्द

Team Agrowon

Nagar News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर निविष्ठा विक्री करताना तसेच अन्य बाबीत दोषी आढळलेल्या सहा कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. यात तीन परवाने कायमस्वरूपी रद्द केले असून, तीन परवाने निलंबित केले आहेत.

नगर जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व अन्य कृषी निविष्ठा गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर मिळून पंधरा भरारी पथके सुरू केली आहेत. ता. १५ पासून कापसासह अन्य बियाणे विक्रीला सुरुवात झाली आहे.

मागील वर्षाचा अनुभव घेतलेल्या काही बियाण्यांना मागणी असते. त्याचाच फायदा घेत कृषी निविष्ठा, खते, बियाण्यांची अधिक दराने निविष्ठा विक्री करणारे दुकानदार विक्री करत असल्याच्या सातत्याने तक्रारी असतात. दरवर्षीच त्यासाठी भरारी पथके काम करतात, मात्र कारवाई होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असते. यंदा अशा तक्रारी आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली असून त्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी भरारी पथकाला सूचना दिल्या आहेत.

जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत केली आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठाची उपलब्धता बाबी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाईल, असे दरवर्षीनुसार यंदा सांगितले जात आहे.

नुकत्याच निरीक्षकानी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या १ बियाणे विक्री केंद्राचे व २ खते विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत तर १ बियाणे, १ खते व १ कीटकनाशके असे ३ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली आहेत.

लिंकिंग थांबणार का?

खरीप, रब्बी हंगाम सुरू झाला की खतांना अधिक मागणी वाढते. त्याचा फायदा उठवत अनेक खत कंपन्यांकडून एका खतासोबत नको असलेले खतही बळजबरीने शेतकऱ्यांना देत लिंकिंग केली जाते. नको असलेल्या खतात प्रामुख्याने विद्राव्य खताचा समावेश असतो. शिवाय काही खत कंपन्यांकडून वाहतूक भाड्यातूनही अधिक रक्कम वसूल केली जाते.

त्याचा आर्थिक भुर्दंड थेट शेतकऱ्यावर पडतो. खताच्या प्रमुख वितरकांची त्यात अधिक मनमानी असते. खत कंपन्यांनी समन्वयासाठी नेमलेले प्रतिनिधी शेतकऱ्यांऐवजी प्रमुख वितरकांची बाजू घेत असल्याचा गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता यंदा खताची लिंकिंग थांबेल की मागील वर्षीप्रमाणेच मनमानी सुरू राहील हा प्रश्‍न मात्र कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT