District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

NDCC Bank : नाशिक जिल्हा बॅंकेची वसुली यंदा घटणार

बॅंकेच्या वसुलीत यंदा ८० ते १०० कोटींनी घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वसुली घटल्याने बॅंकेच्या ‘एनपीएवर’देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Nashik News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर (Nashik District Central Cooperative Bank) जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या झालेल्या बिऱ्हाड आंदोलनानंतर पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी काढलेल्या त्या पत्रामुळे बॅंकेच्या वसुलीवर परिणाम झाला असताना मार्च, एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

त्यामुळे वसुली पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी बॅंकेच्या वसुलीत यंदा ८० ते १०० कोटींनी घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वसुली घटल्याने बॅंकेच्या ‘एनपीएवर’देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेच्या वतीने सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेविरोधात पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने जानेवारीत बिऱ्हाड आंदोलन झाले होते.

या आंदोलनानंतर, पालकमंत्री भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदांवर ६, ७ व ८ टक्के दराने सरळव्याजाची आकारणी करून, तशी माहिती मागविली.

या आदेशानुसार बँकेने विविध कार्यकारी सोसायट्यांना पत्र देत माहिती मागविली. यासाठी पालकमंत्री भुसे यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा झाला. प्रत्यक्षात मात्र, शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. या प्रक्रियेत बॅंकेची वसुली झाली नाही.

गतवर्षी वसुलीचे हेच प्रमाण २६ टक्के होते. यंदा मात्र, एक अंकी टक्यात वसुली झाली असल्याचे समजते. जुनी थकबाकी वसुली करण्याचे प्रमाण संथगतीने सुरू असतानाच, मार्च महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतकरी पुन्हा संकटात सापडला. या परिस्थितीत बॅंकेकडून वसुली कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला. यात बॅंकेने वसुली मोहीम गुंडाळून ठेवल्याचे बघावयास मिळाले.

गतवर्षीच्या तुलनेत ८० ते १०० कोटींनी कमी वसुली झाली असल्याची चर्चा आहे. वसुली घटल्याने बॅंकेचा ‘एनपीए’ वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वसुली घटल्यामुळे खरीप हंगामातील पीककर्ज वाटपावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

नियमित अन् थकबाकी वसुलीनंतर यातूनच बँक पीक कर्ज देते. मात्र, नियमित वसुलीदेखील रखडल्याने, वसुली झाली नाही. वसुली नसल्याने पीक कर्ज कसे द्यायचे हा प्रश्न बॅंक प्रशासनास सतावत आहे.

‘अस्मानी’ संकटाने शेतकरी पुन्हा संकटात

‘अस्मानी’चे संकट काहीसे दूर होऊन मार्चअखेर काही बड्या थकबाकीदारांनी थकबाकी भरली, त्यामुळे दिलासा मिळाला. हे होत नाही तोच, जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गारपीट होऊन पिकांची मोठी हानी झाली आहे.

त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. एकीकडे शेतीमालाला नसलेला दर व दुसरीकडे नैसर्गिक संकटामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी वसुलीवर याचा परिणाम झाला. यामुळे बॅंकेची मार्चअखेर वसुली घटण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT