Pune News: भात पिके काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भात पिकांच्या उत्पादनात एकरी दहा ते वीस टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा निश्चित आकडा समोर आलेला नाही..यंदा मे महिन्यापासून जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकण्यास सुरुवात केली होती. जवळपास २० ते २५ दिवसांत भात रोपे लागवडीस आली. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. मजुरांची टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत..Paddy Crop Damage: नाशिकमधील भात उत्पादक शेतकरी संकटात.जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. उशिराने झालेल्या भात लागवडीमुळे सरासरीच्या ६१ हजार १०१ हेक्टरपैकी ५९ हजार ९३१ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के भात लागवडी झाल्या असल्याचे कृषी विभागाकडे झालेल्या नोंदीवरून दिसून येते. परंतु भात लागवडीनंतर सततच्या पावसामुळे भात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असला तरी मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अजूनही सुरू आहे..किसान सभेचे अमोल वाघमारे म्हणाले, की जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातही पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबेगाव तहसीलदारांकडे किसान सभा आंबेगाव तालुका समितीने केली आहे..Paddy Crop Damage: बळीराजाला आर्थिक चणचण.आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भातपीक हे प्रमुख पीक आहे. यावर्षी भात काढणीला आलेला असताना भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाले असल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी हिताचे विविध निर्णय त्वरित घ्यावेत..यंदा सुरुवातीपासून भात लागवडीला अडथळे आले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे भात उत्पादनात एकरी वीस टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे सुरू आहे. काही ठिकाणी अजूनही ते झालेले नाही.- बाळू बेंढारी, शेतकरी, पोखरी, ता. आंबेगाव.चालू वर्षी सततच्या पावसामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या नाहीत. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यानंतर लागवडी झाल्या. त्यानंतर सतत झालेल्या पावसामुळे भाताचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे झाले आहे. ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आकडेवारी दोन ते तीन दिवसांत अंतिम होईल.- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.