Solapur News: शेतकऱ्यांनी कारखान्यांवर हेलपाटे मारून वेळोवेळी मागणी करूनही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची थकित ऊसबिले दिलेली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, विशालसिंह पाटील, मोहसीन पटेल, इकबाल मुजावर, मकबूल मुबला, शहाजी पवार, नितीन मस्के, नागनाथ सुखले, विजय साठे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मार्च, एप्रिल महिन्यात दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करून ऊसबिले जमा करायला हवी होती. तथापि जून महिना संपला तरीही शेतकऱ्यांना उसबिले मिळाली नाहीत. शेतकरी सध्या पेरणीचा हंगाम सुरू असताना आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.
पेरणी करण्यासाठी शेतात मशागत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरआरसी आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची थकित ऊसबिले तत्काळ जमा करावीत, ही संघटनेची मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.