Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : ‘मॉन्सुनोत्तर’मुळे ऊस तोडणी ठप्प

Post Monsoon Rain : पावसामुळे खानदेशात ऊसगाळप संथ गतीने सुरू आहे. नंदुरबारातील २५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ऊस तोडणी ठप्प आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पावसामुळे खानदेशात ऊसगाळप संथ गतीने सुरू आहे. नंदुरबारातील २५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने ऊस तोडणी ठप्प आहे. यामुळे साखर उत्पादन कमी दिसत आहे. खानदेशात दिवाळीपूर्वीच ऊस तोडणी यंदा सुरू झाली. परतीचा पाऊस नसल्याने तोडणी काही कारखान्यांनी वेळेत सुरू केली. नोव्हेंबरमध्ये तोडणी वेगात सुरू होती.

मागील हंगामात लागवड वाढल्याने यंदा ऊस गाळप २५ लाख टनांपर्यंत जाईल, असेही संकेत आहेत. खानदेशात नंदुरबारात चार व जळगाव जिल्ह्यात तीन साखर कारखान्यांनी ऊस गाळप मागील महिन्यातच सुरू केले.

निरभ्र, कोरड्या वातावरणात गाळप वेगात सुरू होते. परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस पावसामुळे गाळपात व्यत्यय यायला सुरुवात झाली. यातच नंदुरबारात गारपीट, अतिवृष्टी झाल्याने गाळप व ऊस तोडणी ठप्प झाली.

सलग तीन दिवस नंदुरबारात पाऊस झाला. २५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नंदुरबारात १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवडदेखील सुमारे १४ हजार हेक्टरवर झाली आहे. धुळ्यातही सुमारे चार हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

सध्या खानदेशात जळगाव जिल्ह्यातील ऊस तोडणी बऱ्यापैकी सुरू आहे. परंतु धुळ्यातील साक्री, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर भागात ऊस तोडणी ठप्प आहे. वाफसा नसल्याने शेतात तोडणी करण्यासाठी मजूर जाऊ शकत नाहीत. यातच पावसामुळे काही मजूर आपापल्या गावी काही दिवसांसाठी गेले आहेत.

मजूर परतलेले नसल्याने काही भागात तोडणी सुरू झालेली नाही. गाळपात नंदुरबार जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सर्वाधिक गाळप समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील कारखान्याने केले आहे. या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील कारखाने गाळपात पुढे आहेत.

निरभ्र वातावरणाची गरज...

निरभ्र वातावरण सध्याही नाही. स्वच्छ, सूर्यप्रकाशीत वातावरण तयार झाल्यानंतर देखील सहा ते सात दिवस ऊस तोडणी सुरू होणार नाही, अशी स्थिती आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, मुक्ताईनगर भागांत ऊस तोडणी सुरू आहे. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागात ऊस तोडणी सुरू आहे.

परंतु तोडणीला वेग आलेला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील कारखाने मध्य प्रदेशातही ऊस तोडणी करतात. परंतु मध्य प्रदेशातही अतिपावसाने वाफसा स्थिती नाही. शेतकरी ऊस तोडणी करू देण्यास नकार देत आहेत. यामुळे पुढील पंधरवड्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. अशात ऊस उत्पादनावरही परिणाम होईल, असेही संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT