Sugar Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Rate : साखरेच्या दरात क्‍विंटलमागे १० ते ७० रुपयांनी घट

Sugar Market : इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्‍याचा नकारात्मक परिणाम साखर दरावर होत असल्याने साखर उद्योगाच्या अडचणीत आता भरच पडत असल्‍याचे चित्र आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Ethanol Production : कोल्‍हापूर ः इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्‍याचा नकारात्मक परिणाम साखर दरावर होत असल्याने साखर उद्योगाच्या अडचणीत आता भरच पडत असल्‍याचे चित्र आहे. हा निर्णय झाल्यानंतर साखरेच्या दरात क्‍विंटलमागे १० ते ७० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे अस्वस्थतेत भरच पडत असल्‍याचे चित्र आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये साखरेचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीपूर्वी ३७०० ते ३८०० रुपयापर्यंत साखरेचे दर होते. दिवाळीनंतर मागणीत घट आल्‍यानंतर काही प्रमाणात दर स्थिर झाले होते. केंद्राच्‍या इथेनॉल बाबतच्‍या निर्णयानंतर मात्र दरात हळूहळू घट दिसत आहे.
उसाचा रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मिती झाल्‍याने यंदा देशांतर्गंत बाजारात किमान तीस लाख टन साखर विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची चर्चा सध्या बाजारपेठेत आहे. यामुळे देशात विक्रीसाठी जादा साखर उपलब्ध असेल असे अंदाज व्‍यक्त होऊ लागल्‍याने साखरेची खरेदी आता कमी दराने होत आहे. केंद्राने ७ डिसेंबरला नोटिफिकेशन काढल्‍यानंतर साखर दरात दररोज १० ते २० रुपयांनी घसरण होत आहे.

सध्या बाजारपेठेत साखरेला ३५०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत साखरेला मागणीही कमी आहे.सरकारच्या या निर्णयामुळे साखर शिल्लक राहील असे वातावरण तयार करून कमीत-कमी दरात साखर खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. याचा फटका कारखान्‍यांना बसणार असल्‍याची माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. गरज नसताना केंद्राने साखर उद्योगात हस्‍तक्षेप केल्याने साखर उद्योग नाराज असल्‍याचे सध्याचे चित्र आहे.

एकदम निर्णय लादताना घिसाडघाई केल्‍याने साखरेचे अर्थकारण धोक्यात आले आहे.
वॉर रूम स्थापन करून आठ ते दहा दिवसांला साखरेचे उत्पादन व मागणीचा अंदाज घेतला असता व त्‍यानुसार विक्री कोटे दिले असते तर साखरेच्या बाजारातील गोंधळ थांबला असता अशी अपेक्षाही साखर उद्योगाने व्यक्‍त केली. अगोदरच साखर उत्पादन कमी, आणि त्‍यात साखरेचे दर कमी आले तर उद्योगापुढे आव्हानांची मालिकांच तयार होईल, असे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटकातील पाऊस पूर्णपणे थांबल्याने ऊस तोडी हळूहळू वेग घेत आहेत. यामुळे उत्तर प्रदेश बरोबरच या दोन राज्यातील साखर उत्पादनही आठ- दहा दिवसांमध्ये गती येण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादनही वाढेल. ज्या कारखान्यांची जुनी साखर शिल्लक आहे ते कारखाने साखर विक्रीस काढतील पण त्यांना अपेक्षित भाव मिळणार नाही अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT