Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सांगली, कोल्हापुरातील कारखानदारांनी साखर उतारा चोरला ; राजू शेट्टी ः एफआरपी तुकड्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द

Sugarcane Production : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशेबात तयार झालेली साखर हिशेबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत केला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Raju Shetty : सांगली ः गाळप हंगामात उसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशेबात तयार झालेली साखर हिशेबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत केला.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयाने तो निर्णय आजच रद्द केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी म्हणाले, की गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे उसाच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे उसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे. तयार झालेली साखर हिशेबात दाखवलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या साखरेवर कारखानदारांनी दरोडा टाकल्याचे स्पष्ट दिसून येते. याविरोधातही संघटना आवाज उठविणार आहे.

केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा राज्य सरकारला बदलता येत नाही. परंतु तत्कालीन महाविकास आघाडीने कायद्यात बदल केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करण्यात आली होती.

शेट्टी म्हणाले, की सर्व पक्षातील कारखानदार यांनी मिळून केलेल्या षड्यंत्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमधून न्याय मिळवित कारखानदारांच्या चारीमुंड्या चीत करण्यात शेतकऱ्यांना यश आले. महाविकास आघाडी सरकारने हा केलेला कायदा रद्द करून महायुती सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेणे आवश्यक होते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता कुणीच शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. शेतकऱ्यांतर्फे दाखल केलेल्या याचिकेचे अ‍ॅड. योगेश पांडे यांनी कामकाज पाहिले. या निर्णयाने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT